शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

हिंगोली: श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्य ही लक्षणीय अशीच असते. श्रावणात कोणी महिनाभर तर कोणी श्रावणी सोमवार उपवास म्हणून ...

हिंगोली: श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांची संख्य ही लक्षणीय अशीच असते. श्रावणात कोणी महिनाभर तर कोणी श्रावणी सोमवार उपवास म्हणून धरतो. अनेक जण उपवासाचे काही न खाता उपवास करत रात्रीला उपवास सोडतात. रात्रीला जेव्हा उपवास सोडतात त्यावेळी त्यांच्या जेवणात जड पदार्थ असतात. हे जड पदार्थ पचण्यास कठीण जाते. साबुदाणा पचण्यास कठीण असल्यामुळे तो न खाल्लेला बरा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

दर का वाढले?

जुलै महिन्यापासून साबुदाणा व शेंगदाण्याचे भाव थोडेबहुत कमी-जास्त होत आहेत. भगर जुलै महिन्यात ११० तर ऑगस्टमध्ये १२० रुपये किलोने विक्री होत आहे. भगरीचे उत्पादन आपल्याकडे नसल्यामुळे बाहेरुन भगर आणावी लागते. अनेक जण उपवासाला भगर खातात. परिणामी भाव वाढल्याचे दुकानदार सुरेंद्र महाजन यांनी सांगितले.

उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो)

भगर

१० जुलै मध्ये ११०

१० ऑगस्टमध्ये १२०

साबुदाणा

१० जुलै ६०

१० आॅस्ट ६०

नायलॉन साबुदाणा

१० जुलैमध्ये ११०

१० ऑगस्टमध्ये ११०

साबुदाणा आरोग्याला हानिकारक...

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाण्यास काही हरकत नाही. परंतु, तो पचण्यास कठीण जातो. मनुष्याने आठवड्यातून एक दिवस उपवास करायला पाहिजे. परंतु, जड पदार्थ खाण्यास टाळावे. साबुदाणा, शेंगदाणे हे उपवासाच्या दिवशी पचत नाहीत. शरीराची क्रिया सुरळीत राहण्यासाठी हलके पदार्थ खाऊन उपवास धरल्यास मनुष्य आजारी पडत नाही. उपवासाच्या दिवशी फळांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

उपवास आहे, मग हे पदार्थ खा !

आठवड्यातून एक दिवस उपवास धरुन शरीराला आराम दिलाच पाहिजे. पण उपवासाच्या दिवशी न पचणाऱ्या पदार्थापासून सावध राहिले पाहिजे. डाळींब, सफरचंद, नारळाचे पाणी अशा फळांना प्राधान्य दिल्यास शरीर साथ देते. विशेष करुन उपवासाच्या दिवशी पाणी जास्त पिणे गरजेचे आहे. पाणी जास्त पिल्यास कोणतेही पदार्थ पचण्यास सोपे जातात.

- डॉ. दीपक मोरे, आहारतज्ज्ञ