वसमत : तालुक्यातील गिरगाव ते वडगाव नदीवर बंधाऱ्यामुळे एक हजार हेक्टर जमिनीचे सिंचानाची सोय होणार आहे. या भागासाठी हा बंधारा वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ. राजू नवघरे यांनी केले.
वडगाव बंधारा उद्घाटनप्रसंगी आ. नवघरे बोलत होते. वडगावच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सिंचनातही वाढ होण्यास मदत होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी कार्यकारी अभियंता पी.आर.देशमुख होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल, तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम, जिजाराव हरणे, तान्हाजी बेंडे, बालाजी ढोरे, गजानन ढोरे, अंबादास जाधव, कळमनुरीचे माजी उपसभापती मारोतराव गाडेकर, चेअरमन सुनिल पाटील, भगवान कऱ्हाळे, अरुन पाटील, शिवदास चंदेवार,संजय त्रिफळे, तुषार नादरे, देविदास साखरे, गोविंद कऱ्हाळे, उमेश नादरे, प्रभाकर बारसे, शिवाजी काळे, बाळु भाग्यवंत, अमोल कऱ्हाळे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. फोटो नं. ३४