शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

प्रखर ऊन, संचारबंदीही नागरिकांचे फिरणे थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू ...

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू लावून रस्ते अडवून ठेवले आहे. असे असताना नागरिक प्रखर उन्हातही मेडिसीन, किराणा व भाजीपाल्याचे कारण देत रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत.

१४ एप्रिलच्या रात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे. जे नागरिक विनाकारण विनामास्क बाहेर पडतील त्याची अँटिजेन तपासणी करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे, एवढेच नाही तर नगरपरिषदेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंडही लावला जात आहे तरीही काही लोक प्रखर उन्हाची पर्वा न करता मेडिसीन, किराणा, भाजीपाला, दवाखान्यात जायचे आहे, असे जुजबी न पटण्यासारखे कारण देत रस्त्याने विनाकारण आणि विनामास्क फिरताना दिसत आहेत. फिरणाऱ्यांचे कारण खरे असेल तर त्यास सोडून दिले जात आहे परंतु, कारण जर पटण्यासारखे नसल्यास त्यास नांदेड नाका, चौधरी पेट्रोल पंप येथे कोरोना तपासणी करण्यास पाठविले जात आहे.

तिप्पलसीट जाणे पडले महागात

२० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातून नांदेड नाकाहून खटकाळीकडे जाणाऱ्या एका मोटारसायकलवरील तिघांना पोलिसांनी थांबविले. विशेष म्हणजे तिघांनीही मास्क लावले नव्हते. वाहन थांबविताच मागच्या तिसऱ्याने खाली उतरून पळ काढला; परंतु, काहीच अंतरावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. या अगोदरच पोलिसांनी दोघांनाही पकडून ठेवले होते. अखेर तिघांनाही अँटिजेन टेस्ट करण्यास भाग पाडले. कोरोना तपासणीनंतर त्यांना कुठे पाठविले हे मात्र कळू शकले नाही.