शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

प्रखर ऊन, संचारबंदीही नागरिकांचे फिरणे थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू ...

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर नागरिकांना अटकाव करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने मोक्याच्या ठिकाणी बांबू लावून रस्ते अडवून ठेवले आहे. असे असताना नागरिक प्रखर उन्हातही मेडिसीन, किराणा व भाजीपाल्याचे कारण देत रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत.

१४ एप्रिलच्या रात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे. जे नागरिक विनाकारण विनामास्क बाहेर पडतील त्याची अँटिजेन तपासणी करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे, एवढेच नाही तर नगरपरिषदेच्यावतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंडही लावला जात आहे तरीही काही लोक प्रखर उन्हाची पर्वा न करता मेडिसीन, किराणा, भाजीपाला, दवाखान्यात जायचे आहे, असे जुजबी न पटण्यासारखे कारण देत रस्त्याने विनाकारण आणि विनामास्क फिरताना दिसत आहेत. फिरणाऱ्यांचे कारण खरे असेल तर त्यास सोडून दिले जात आहे परंतु, कारण जर पटण्यासारखे नसल्यास त्यास नांदेड नाका, चौधरी पेट्रोल पंप येथे कोरोना तपासणी करण्यास पाठविले जात आहे.

तिप्पलसीट जाणे पडले महागात

२० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरातून नांदेड नाकाहून खटकाळीकडे जाणाऱ्या एका मोटारसायकलवरील तिघांना पोलिसांनी थांबविले. विशेष म्हणजे तिघांनीही मास्क लावले नव्हते. वाहन थांबविताच मागच्या तिसऱ्याने खाली उतरून पळ काढला; परंतु, काहीच अंतरावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. या अगोदरच पोलिसांनी दोघांनाही पकडून ठेवले होते. अखेर तिघांनाही अँटिजेन टेस्ट करण्यास भाग पाडले. कोरोना तपासणीनंतर त्यांना कुठे पाठविले हे मात्र कळू शकले नाही.