शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

आश्वासने पूर्ण न झाल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

हिंगोली : वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोरोनाच्या रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ...

हिंगोली : वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोरोनाच्या रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्त मागे घेतले आहे. मात्र चार दिवसात सुधारणा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

औषधी, इंजेक्शनचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ, स्वच्छतेचा अभाव, शुद्ध पाणीपुरवठ्याचे बंद पडलेले फिल्टर सुरू करणे आदी मागण्यांसाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यासह माजी आ. गजानन घुगे, के. के. शिंदे, हमिद प्यारेवाले, कोटकर, हरिश्चंद्र शिंदे, प्रशांत सोनी, संजय कावडे, संजय ढोके, मोतीराम इंगोले आदींनीही जिल्हा कचेरीसमोर उपोषण केले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, प्रशासनाची प्रत्येक बाबतीत कुचकामी भूमिका आहे. गर्दी टाळण्यासाठीचे उपाय व्यवस्थित होत नाहीत. रोज किराणा कुणाला लागतो? मात्र तरीही या नावाखाली रस्त्यावर गर्दी आहे. यापूर्वीही संचारबंदीत अशीच गर्दी होत होती. प्रशासनाने यावर नियंत्रण आणले पाहिजे. कोरोना रुग्णालयात असुविधांचा सामना करावा लागू नये म्हणून निधी देण्याचीही तयारी आहे. मागच्या वेळी ५० लाख रुपये व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन आदींसाठी दिले होते. त्याचे काय केले? हे सुद्धा प्रशासनाला सांगता येत नाही. यावरही प्रशासनाला जाब मागायची आता वेळ आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी गैरसोयींबाबत कबुली दिली. तर त्या दूर करण्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र चार दिवसात यावर निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असेही आ. मुटकुळे म्हणाले.