शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पाच महिन्यांमध्ये ८ गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST

हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक ...

हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात आली. तपासणीअंती २१९ पाणी नमुने हे दूषित आढळून आले आहेत.

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत औंढा, वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव येथे रासायनिक व जैविक तपसणीअंती घटकनिहाय दूृषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. टीडीएस या घटकांतर्गत २ हजारपेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने १०, फ्लोराइड घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने २९, नायट्रेट घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक पाणी नमुने ६०, आयर्न घटकांतर्गत १.० पेक्षा अधिक मात्रा असलेली पाणी २६ नमुने आढळून आले. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास संबंधित पाचही तालुक्यांच्या गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करून यावर उपाययोजना करण्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात हिंगोली येथे एक मुख्य प्रयोगशाळा असून कळमनुरी, सेनगाव आणि वसमत येथे प्रत्येकी एक उपविभागीय प्रयोगशाळा आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज (एनएबीएल) या परीक्षणातून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही सहायक भूवैज्ञानिक मांजरमकर यांनी सांगितले.

पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात...

पाणी नमुन्यांची तपासणी जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा केली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या जल सुरक्षामार्फत पाण्याचे नमुने जिल्ह्यातील मुख्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यानंतर पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल दिला जातो. सदरील प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुन्यांचीही तपासणी करण्यात येते. नागरिकांनी प्रयोगशाळेत पाणी नमुने घेऊन यावेत.

- रवींद्र मांजरमकर, सहायक भूवैज्ञानिक