शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

महागाईची हद्द झाली, खताचे दर शंभर ते अडीचशे रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

हिंगोली : खत उत्पादन कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ केली आहे. खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ...

हिंगोली : खत उत्पादन कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ केली आहे. खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असली तरी उत्पन्न मात्र तेवढेच राहात असल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहात आहे.

खत उत्पादक कंपन्यांनी १ मार्चपासून खताच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खताच्या दरात १०० ते २५० रुपयांनी वाढ होणार आहे. रब्बी हंगामातील पिके जवळपास काढणीला आली आहेत. आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागले असून, आतापासूनच शेतीची मशागत करीत आहेत. तसेच खत, बियाण्यांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. मात्र, आता खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. खताच्या जुन्या साठ्याला दरवाढ लागू नसली तरी अनेक ठिकाणी जुन्या साठ्यातील खत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून येत आहेत. नवीन खताची रॅक शक्यतो मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यात लागत असते, असे बोलले जात आहे. त्यानंतरच नवीन खताचा साठा उपलब्ध होतो. त्यावेळी मुबलक खत उपलब्ध झाले, तरीही शेतकऱ्यांना जादा रक्कम देऊनच खत खरेदी करावी लागणार आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम

मागील महिनाभरापासून इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच आहेत. याचा परिणाम खताच्या उत्पादन खर्चावरही होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच खताचे दर वाढले असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार असल्याचे चित्र आहे.

डिझेल दरवाढीने मशागतही महागली

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. गतवर्षी नांगरणी ११०० रुपये प्रतिएकर होती. ती आता १२०० रुपये झाली आहे. तसेच रोटावेटर ८०० वरून १ हजार रुपये, खुरटणी ६०० वरून ७०० रुपये, पेरणी ५०० वरून ७०० रूपये दर झाले आहेत. डिझेल दरवाढीचाही फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. उत्पादन खर्च वाढला असला तरी उत्पन्न मात्र तेवढेच राहात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे.

प्रतिक्रिया

मागील पूर्ण वर्ष कोरोनाच्या संकटात गेले. शेतीसोबत सगळेच व्यवसाय अडचणीत आले. शेती उत्पादन निम्म्यावर आले असून, जीवनावश्यक वस्तूंसोबत आता खतांचे दरही वाढले आहेत. खताची दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही.

- ज्ञानदेव खराटे, कौठा

शेतीशी निगडीत सगळ्याच बाबींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समीकरण बिघडत चालले आहे. डिझेल भाववाढीमुळे मशागत करताना अडचण येत असून, खर्च व उत्पादन यांचा कसा मेळ बसवावा, हेच समजत नाही.

तुकाराम भूतनर, धामणगाव

डिझेल दरवाढीमुळे मशागतींचे दर वाढले आहेत. त्यात खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाला पुरेसा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणितच कोलमडले आहे.

- देविदास माखणे, साळवा

खताचा प्रकार आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११०० १२५०

१२-३२-३२ ११०० १२००

२४-२४-० १२५० १४००

एसएसपी ३१० ३८०

डीएपी १२०० १३०० ते १३५०