शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
5
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
6
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
7
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
8
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
9
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
10
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
11
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
12
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
13
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
14
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
15
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
16
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
17
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
18
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
19
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
20
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणी क्षेत्रात घट; जिल्ह्यात करडई, भुईमुगाचा पेरा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST

हिंगोली : जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनचा पेरा दिवसेंदिवस वाढत असून, इतर पिकांचे क्षेत्र मात्र घटत असल्याचे चित्र ...

हिंगोली : जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनचा पेरा दिवसेंदिवस वाढत असून, इतर पिकांचे क्षेत्र मात्र घटत असल्याचे चित्र आहे. करडई, भुईमुगाचा पेरा तर निम्म्यापेक्षाही कमी झाला असून, वाढता उत्पादन खर्च, अपुरे पर्जन्यमान यामुळे घटलेला हा पेरा आता वाढत नसल्याचे दिसत आहे.

हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी खरीप हंगामात जवस तर रब्बीत सूर्यफूल, करडई आदी पिकांच्या पेरणीचे क्षेत्र हे हजार हेक्टरच्याही पुढे होते. मात्र, दिवसेंदिवस या पिकांच्या पेऱ्यात घट होत आहे. सोयाबीन एकतर ९० दिवसात येते शिवाय इतर रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. त्यामुळे गतवर्षी सोयाबीन २.३५ लाख हेक्टरवर होते. गत खरीप हंगामात हे पीक २.८४ लाख हेक्टरवर गेले होते. सूर्यफूल ३०० हेक्टरपेक्षा जास्त असायचे. मात्र, आता ते ५० हेक्टरवर आले असून, करडई पीकसुद्धा गतवर्षीपर्यंत ७०० हेक्टरपर्यंत होते. ते आता ४०० हेक्टरपर्यंत घसरले आहे. जवस आंतरपीक म्हणून अनेक ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे पूर्वी ३०० हेक्टरपर्यंत असणारे हे पीक आता १०० हेक्टरपर्यंत आले आहे. हिंगोली जिल्ह्यात सिंचनाच्या पट्ट्यात भुईमुगाचा पेराही १ हजार हेक्टरच्या आसपास होता, तोही दिवसेंदिवस घटत आहे. जनावरांना चारा व शेंगा अशा दुहेरी बेताने हे पीक घेतले जायचे.

करडई हद्दपार, भुईमुगाचे क्षेत्रही घटतेच

जिल्ह्यात करडईचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. या पिकाचा उत्पादन खर्च जास्त असून, ते रोगालाही लवकर बळी पडते. तसेच काढणीला मजूरही मिळत नाहीत. काटेरी झाड असल्याने मजुरीही जास्त लागते. त्यामुळे हे पीक दुर्लक्षित होत आहे. तर जवस आंतरपीक म्हणून घेतले जायचे, त्याकडेही आता अनेक शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. सूर्यफुलाची पेरणी केवळ तेलासाठीच केली जायची. सोयाबीनच्या पर्यायाने ती घटली आहे तर भुईमुगाचा पेरा काही वर्षे सतत पर्जन्यमान कमी झाल्याने घटला आहे. त्यानंतर इतर पर्याय निवडलेले शेतकरी आता या पिकाकडे वळत नाहीत.

मागील काही वर्षांत जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनचा पेरा प्रचंड वाढला. कमी खर्च, कमी दिवसात हे पीक येते. त्यातच रोगाला कमी बळी पडते. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. तर करडई, भुईमुगाला खर्च जास्त येतो. या पिकासाठी निसर्गावरही अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र घटले आहे. मुळात या पिकांकडे यापूर्वीही शेतकऱ्यांचा तेवढा कल नव्हताच.

- विजय लोखंडे, कृषी अधीक्षक अधिकारी

ग्रामीण भागात सोयाबीन येण्यापूर्वी सूर्यफुलाच्या पेरणी क्षेत्रात सातत्य असायचे. करडई हे पीक घरच्यापुरते घेतले जायचे. आता हे पीक घेणे अवघड झाले. त्यात मर रोग आला की, पीक हातचे जाते. रोगांना लवकर बळी पडते व काढणीला मजूरही मिळत नाहीत. चांगले पर्जन्यमान झाले व वेळेत पेरणी केली तरच उन्हाळी भुईमूग हाती लागतो. त्यामुळे हे पीकही कमी होत आहे.

- तातेराव मोरे, शेतकरी