शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

कळमनुरी : येथील आगारातून शहरी भागासाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, ग्रामीण भागात अजूनही येथील आगाराने बसेस सोडलेल्या ...

कळमनुरी : येथील आगारातून शहरी भागासाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, ग्रामीण भागात अजूनही येथील आगाराने बसेस सोडलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळल्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट झाली आहे. काेराेनामुळे मागील मार्च महिन्यांपासून ग्रामीण भागात बंद असलेली बससेवा अजूनही सुरू केली नाही. कळमनुरी आगारातून ग्रामीण भागासाठी बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. शहरी भागातच एसटीच्या बसफेऱ्या सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न घटत चालले आहे. हिंगोली - नांदेड मार्गावर खासगी बसेस चालतात. त्यामुळे या मार्गावरील एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू नसल्याने अवैध वाहतूकवाले ग्रामीण भागात पोहोचले असून अवैध वाहतुकींने चांगलेच डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात बसेस सुरू नसल्याने या भागातील नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथील आगाराचे दररोजचे साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आगाराचे उत्पन्न कमी होत आहे. या वाहतुकीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कळमनुरी आगारातील १४ चालक - वाहक मुंबई येथे गेले आहेत. यामुळे येथे वाहक - चालकांची संख्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागात बसेस सोडण्यात येत नाहीत. परंतु, अनेकांकडून ग्रामीण भागात बसेस सोडण्याची मागणी होत आहे. चालक वाहकांअभावी ग्रामीण भागात बसेस सोडण्यात येत नाहीत. मुंबईहून चालक - वाहक परत आल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती स्थानक प्रमुख शेख फेरोज यांनी दिली.