शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने ...

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने पोलीस व आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. एरवी योग शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतली जात असली तरी कोरोनाकाळात मात्र त्यांना खो बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मासिक थकवा कसा घालविणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोना रोखण्यासाठी सर्वच विभागांचे कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असले तरी यात आरोग्य व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे काम वाढले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बाध घातल्याने या नियमांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आली आहे. यातून ताणतणाव वाढत असून मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. दोन्ही विभागांच्या वतीने योग शिबिरे, ध्यानधारणा शिबिरे घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र कोरोनाच्या काळात या शिबिराला खो बसल्याने दिसत आहे. त्यामुळे कोरोनाकाळात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील एकूण पोलीस - १०८९

पोलीस अधिकारी - ७८

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी - ९३१

डॉक्टर्स - १५०

प्रतिक्रिया

पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी योगा, ध्यानधारणा शिबिरे घेतली जातात. मात्र पोलीस ठाणे स्तरावर ही शिबिरे झाल्यास जास्त फायदा होईल. सध्या कोरोनामुळे काम वाढले असून कुटुंबीयांना वेळही देता येत नाही. त्यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे कुटुंबांना वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. तसेच योग शिबिरे, ध्यानशिबिरेही घेतली जातात. मात्र त्यात सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग क्वचित असतो, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कामही वाढले आहे. यात कुटुंबाला वेळ देताना व आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नियमित योगा शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतल्यास कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे मत एका आरोग्य कर्मचाऱ्याने व्यक्त केले.

कोरोनामुळे कुुटुंबाला वेळही देता येत नाही. जास्त वेळ दवाखान्यातच जात असल्याने मानसिक थकवा जाणवत आहे. मात्र रुग्णांना उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. यातून त्यांच्या समस्याचे निराकरण केले जाते. तसेच योग शिबिर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांतून कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन शिबिरे घेतली जातात. तसेच सोशल वर्करमार्फत कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक