शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

उन्हाचा पारा वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी हिंगोली: अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी शहरात दाखल झाली आहे. घराच्या छतावरुन उड्या मारत ...

वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी शहरात दाखल झाली आहे. घराच्या छतावरुन उड्या मारत छोटी-मोठी वानरे अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहे. शहरातील शिवाजीनगर,जिल्हा परिषद परिसर, खटकाळी, तोफखाना, रेल्वे स्टेशन परिसर आदी भागात वानरांनी उच्छाद मांडला आहे. वन विभागाने वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त

कळमनुरी: शहरासह परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गत पंधरा-वीस दिवसांपासून तर वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. काही ठिकाणी भारनियमनाव्यतिरिक्त वीज खंडित होत आहे. परिणामी विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

नांदेड नाक्यावरील डांबर वितळू लागले

हिंगोली: शहरातील नांदेड नाका ते उड्डाणपुलापर्यतच्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. नांदेड नाक्यावर जास्त प्रमाणात डांबर टाकल्या गेल्यामुळे ते उन्हामुळे वितळू लागले आहे. परिणामी वाहनचालकांसाठी ते धोकादायक झाले आहे. ज्या ठिकाणी डांबर जास्त प्रमाणात पडले आहे त्या ठिकाणी गिट्टीचा चुरा टाकून दबई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मिरचीवर फवारणी करण्याचे आवाहन

हिंगोली: जिल्ह्यात मिरची पिकावर चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फिप्रोनिल ५ टक्के १० मिली किंवा थायामिथॉक्झाम १२.६ टक्के, लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के ३ मिली प्रती १० लिटरत पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी हंगामासाठी लागवड केेलेल्या भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

संत्रा, मोसंबी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे आवाहन

हिंगोली: कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता संत्रा, मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लिंबूवर्गीय पिकांमध्ये कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायकोफॉल १८.५ टक्के २ मिली किंवा प्रोपरगाईट २० टक्के एक मिली किंवा इथिऑन २० टक्के २ मिली किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

हिंगोली: येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यास कचरा प्रवाशांच्या अंगावर उडून येत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही अद्याप लक्ष दिले गेेले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.