शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

उन्हाचा पारा वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी हिंगोली: अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी शहरात दाखल झाली आहे. घराच्या छतावरुन उड्या मारत ...

वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: अन्न व पाण्याच्या शोधात वानरांची टोळी शहरात दाखल झाली आहे. घराच्या छतावरुन उड्या मारत छोटी-मोठी वानरे अंगणात ठेवलेल्या वस्तुंची नासाडी करीत आहे. शहरातील शिवाजीनगर,जिल्हा परिषद परिसर, खटकाळी, तोफखाना, रेल्वे स्टेशन परिसर आदी भागात वानरांनी उच्छाद मांडला आहे. वन विभागाने वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त

कळमनुरी: शहरासह परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गत पंधरा-वीस दिवसांपासून तर वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. काही ठिकाणी भारनियमनाव्यतिरिक्त वीज खंडित होत आहे. परिणामी विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

नांदेड नाक्यावरील डांबर वितळू लागले

हिंगोली: शहरातील नांदेड नाका ते उड्डाणपुलापर्यतच्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. नांदेड नाक्यावर जास्त प्रमाणात डांबर टाकल्या गेल्यामुळे ते उन्हामुळे वितळू लागले आहे. परिणामी वाहनचालकांसाठी ते धोकादायक झाले आहे. ज्या ठिकाणी डांबर जास्त प्रमाणात पडले आहे त्या ठिकाणी गिट्टीचा चुरा टाकून दबई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मिरचीवर फवारणी करण्याचे आवाहन

हिंगोली: जिल्ह्यात मिरची पिकावर चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फिप्रोनिल ५ टक्के १० मिली किंवा थायामिथॉक्झाम १२.६ टक्के, लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के ३ मिली प्रती १० लिटरत पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी हंगामासाठी लागवड केेलेल्या भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

संत्रा, मोसंबी पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे आवाहन

हिंगोली: कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता संत्रा, मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लिंबूवर्गीय पिकांमध्ये कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायकोफॉल १८.५ टक्के २ मिली किंवा प्रोपरगाईट २० टक्के एक मिली किंवा इथिऑन २० टक्के २ मिली किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

हिंगोली: येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. वाऱ्याची झुळूक आल्यास कचरा प्रवाशांच्या अंगावर उडून येत आहे. महामंडळाच्या संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही अद्याप लक्ष दिले गेेले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.