शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

हिंगोलीतही साडेचार कोटीच्या धान्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

हिंगोली : तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल ...

हिंगोली : तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल तांदूळ अशा १६ हजार २६७ क्विंटलची अनियमितता झाली असून, यातील दोषी संबंधितांवर कारवाईची मागणी विराट लोकमंचच्या शेख नईम शेख लाल यांनी केली आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचा दाखला दिला आहे. तर प्रशासनाकडून यात संबंधितांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना कारवाईचा अहवाल पाठविला जाईल, असे सांगण्यात आले.

दिलेल्या तक्रारीत म्हटले की, जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने नियतनापेक्षा जास्त ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल तांदूळ असे एकूण १६ हजार २६७ क्विंटल धान्याचा जास्तीचा पुरवठा केला. याचाी बाजारभावाने ४.६१ कोटी रुपये एवढी किंमत होते. यामुळे पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य लाभापासून वंचित केले. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अहवालात ऑनलाईन वितरणातील आकडेवारी विचारात न घेता नियतन मंजूर करणे, मंजूर केलेल्या नियतनाच्या तुलनेत रास्त दुकानदारांना अधिकचे वाटप करणे, पुरवठाविषयक अभिलेखे अद्ययावत न ठेवणे, या सर्व बाबी विचारात घेता कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने सदरील अनियमितता केली आहे. या निष्कर्षाप्रत ही चौकशी समिती आलेली आहे, असेही म्हटले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून या रकमेची वसुली करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यात तत्कालीन तहसीलदारांची विभागीय चौकशीही लावली. विभागीय आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता.

याबाबत पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र या अहवालात काही त्रुटी आढळल्याने तो परत आला होता. आता पुन्हा त्या त्रुटी दूर करण्यासाठी फेरचौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झाली. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून संबंधितांना नोटिसा बजावून खुलासे मागविले आहेत. हे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.