शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

हरभरा पीक काढणीस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वाहने हिंगोली : येथील बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोरच ऑटोरिक्षा उभी केली जात आहेत. त्यात दुचाकी वाहनेही बसस्थानक परिसरात ...

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वाहने

हिंगोली : येथील बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोरच ऑटोरिक्षा उभी केली जात आहेत. त्यात दुचाकी वाहनेही बसस्थानक परिसरात कुठेही उभी केली जात असल्याने बसचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा प्रवासी घेण्याच्या नादात काही चालक थेट वाहने बसस्थानकाच्या आवारात नेत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन प्रवेशद्वार आडविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने

हिंगोली: शहरात अनेक भागात अल्पवयीन मुले वाहने चालविताना दिसून येत आहेत. एक तर वाहतुकीचे कोणतेही नियम माहीत नाहीत. त्यात भरधाव वाहने चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन अशा मुलांच्या पालकांना समज देऊन अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत यासाठी पालकांचे समुपदेशन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

एसटी बसला प्रवाशांची गर्दी

हिंगोली : येथील आगारातून अकोला, नांदेड, परभणी, सेनगाव आदी मार्गावर बसेस धावतात. येथील आगारातील काही बसगाड्या मुंबई येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच उपलब्ध असलेल्या बसेसला प्रवाशांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आगारात जादा बस उपलब्ध करून त्या विविध मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्हा रूग्णालयात रूग्णांची गर्दी

हिंगोली : येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारावर उपचार करणारे डॉक्टर असल्याने जिल्हाभरातून रूग्ण उपचारासाठी येत आहेत. दोन दिवसांपासून विविध आजाराच्या रूग्णांसह इतर कामानिमित्त येणाऱ्या नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे चित्र रूग्णालयात पहावयास मिळत आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी रूग्णालयास भेट देऊन विविध आजारांच्या रूग्णांची विचारपूस केली होती.

धोकादायपद्धतीने वाहने उभी

हिंगोली: शहरातील औंढा नागनाथ रोडवर अनेक चालक मुख्य रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे. अनेकवेळा दोन्ही बाजूंनी वाहने आल्यास वाहतूक विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे वाहने उभी करून बराच वेळ चालक इतरत्र फिरत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या मार्गावर विनाकारण वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तुरीच्या उत्पादनात घट

हिंगोली: कळमनुरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कापसासोबत तूर पीक घेतले आहे. जास्त पाऊस झाल्याने तुरीचे पीक जोमात वाढूनही वाळून गेले होते. आता तूर कापणी जवळपास संपत आली असून मळणीयंत्राद्वारे पिकाची काढणी केली जात आहे. परंतु, उत्पादनात मोठी घट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यातून फवारणीचा केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.