शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा कचेरीवर ग्रामसेवकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:18 IST

ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा जाण तणाव कमी करुन धुळे येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्याच्यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा कचेरीवर २४ जानेवारी रोजी मोर्चा काढला.

ठळक मुद्देमागण्या : अवांतर कामे वगळण्यात यावीत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा जाण तणाव कमी करुन धुळे येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्याच्यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा कचेरीवर २४ जानेवारी रोजी मोर्चा काढला.पंचायत संस्थेत ग्रामपंचायत ही ग्रामीण जनतेशी व विकासाशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या संस्थेत ग्रामसेवक संवर्ग काम करतो. परंतु सद्यस्थितीत ग्रामसेवक ग्रामविभागाशी संबंधीत कर्मचारी न राहता मंत्रालयाची ग्रामीण पातळीवर कामे करणारा कर्मचारी आहे. मात्र तलाठी, कृषी सहायक, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, परिचारिका, लाईनमन, वनरक्षक आदींची कामे ग्रामसेवकावर सोपवली जात आहेत. तर शेतकरी कर्जमाफी, अर्ज भरणे, ग्रामसभा, बोंडबळी पंचनामे, बिजली सर्वेक्षण, पाणलोट समिती सचिव, कृषि पीकविमा, शेतातील पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, बोगस डॉक्टर तपासणी, कीटकनाशक शेतकरी विषबाधा, तसेच गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, प्लास्टिक गोळा करणे, वृक्ष लागवड, नवीन वाळू घाटाचे धोरण, महसूल विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना इ. कामांचा भार ग्रामसेवकांवर सोपवून त्यांना वेठीस धरले जात आहे. केंद्र, राज्य शासन व जि.प.च्या उत्पन्नाच्या योजना नागरिकांच्या मूलभूत गरजा, दैनंदिन कामकाज करीत असतानाही वरिष्ठ अधिकाºयांचा दबाव विनाचौकशी विनानोटीस निलंबित करणे, वेतनवाढ बंद करणे आदी प्रकारचा त्रास दिला जात आहे. तसेच मनरेगासारख्या मागणी आधारित योजनाही उद्दिष्ट देऊन करावयास भाग पाडणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामसेवक संवर्ग रात्रंदिवस काम करीत असला तरीही नागरिकाची उदासीनता व त्यांच्या दृष्टीने शौचालय प्राथमिकता नसल्याने कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्हाभरातील ग्रामसेवकांवर कारवाया झाल्या. परिणामी, दोन वर्षात ४० ते ५० ग्रामसेवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सरचिटणीस राजेश किलचे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.हल्ले वाढले : अतिरिक्त कामाचाही ताणराज्यात एक ते दीड हजारच्या वर ग्रामसेवकांवर प्राणघात्तक हल्ले झाले. तसेच हाणामाºया, शिवीगाळ, अरेरीवीची तर भाषा नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे एस. बी. वाघ यांच्या आत्महत्येची चौकशी सी.आय.डी मार्फत करावी, वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करुन त्यांच्यावरील ताण कमी करावा, ग्रामसेवकांचे प्रश्न निकाली काढावे आदी मागण्यासाठी महाराष्टÑभर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मोर्चा काढला.