शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या 'एनओसी'नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा ...

हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात अद्याप एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष वर्ग भरविले जात नाहीत. सध्या जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. दोन दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्या तरी कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी एक ते दीड वर्षापासून घरीच आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण होऊन बसेल. त्यात मुले घरी राहत असल्याने विविध दुष्परिणामाला सामोरे जात आहेत. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता कोरोनामुक्त गावात पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, ग्रामपंचायत व पालकांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे, तसेच वर्ग सुरू झाल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे.

पालकांचीही हा

शाळा बंद असल्याने मुले घरी राहून कंटाळली आहेत, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू कराव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- सुरेश पाईकराव

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले मोबाईलमध्ये व्यस्त राहत आहेत. त्यामुळे डोळ्याचे आजार व इतर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल.

-दीपक पतंगे

एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त केली जात आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भाचा ठराव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याची माहिती आहे.

शाळा बंद असल्याने होताहेत दुष्परिणाम

शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी राहत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. त्यात सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर, मानसिक तणाव, चिडचिडेपणा वाढत आहे. त्यात बालविवाह, बालमजुरीचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले आहे. मुलींना शेती कामात ठेवणे आदी नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात, असा सूर पालकांतून उमटत आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा - १३२५

शासकीय -८८६

अनुदानित -२३४

विनाअनुदानित -२०५

कोरोनामुक्त गावे -