शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या 'एनओसी'नंतरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा ...

हिंगोली : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास शासनाने सहमती दिली असली तरी ग्रामपंचायत व पालकांनी परवानगी दिली, तरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात अद्याप एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष वर्ग भरविले जात नाहीत. सध्या जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. दोन दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्या तरी कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी एक ते दीड वर्षापासून घरीच आहेत. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण होऊन बसेल. त्यात मुले घरी राहत असल्याने विविध दुष्परिणामाला सामोरे जात आहेत. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता कोरोनामुक्त गावात पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, ग्रामपंचायत व पालकांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे, तसेच वर्ग सुरू झाल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे.

पालकांचीही हा

शाळा बंद असल्याने मुले घरी राहून कंटाळली आहेत, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू कराव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- सुरेश पाईकराव

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले मोबाईलमध्ये व्यस्त राहत आहेत. त्यामुळे डोळ्याचे आजार व इतर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल.

-दीपक पतंगे

एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त केली जात आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्यासंदर्भाचा ठराव शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याची माहिती आहे.

शाळा बंद असल्याने होताहेत दुष्परिणाम

शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी राहत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. त्यात सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर, मानसिक तणाव, चिडचिडेपणा वाढत आहे. त्यात बालविवाह, बालमजुरीचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले आहे. मुलींना शेती कामात ठेवणे आदी नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात, असा सूर पालकांतून उमटत आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा - १३२५

शासकीय -८८६

अनुदानित -२३४

विनाअनुदानित -२०५

कोरोनामुक्त गावे -