शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

शासनाने शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करावी

By admin | Updated: November 3, 2014 15:03 IST

दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी केली.

अर्धापूर : सोयाबीन, कापूस, ज्वारी पिके हातची गेल्याने सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत केली पाहिजे, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक १ गाळप हंगामाचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले, सभापती वंदना लहानकर उपस्थित होत्या.  यावेळी खा.अशोकराव चव्हाण म्हणाले, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे तीन युनिट कर्जमुक्त झाले असून चौथ्या युनिटच्या कर्जाची परतफेड चालू आहे. त्यामुळे नवीन पाचवा कारखाना चालवायला घेण्याएवढी आर्थिक बाजू भक्कम नाही. पण माझ्या मतदारसंघातील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी सर्वस्वी प्रयत्न करील असे सांगितले. २0१३-१४ च्या हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चार युनिटमध्ये १२ लाख ९३ हजार ४८३ मे. टन उसाचे गाळप यशस्वीरित्या पूर्ण केले. शेतकर्‍यांनी कारखान्याच्या ऊस लागवड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन गणपतराव तिडके यांनी प्रस्ताविकातून केले.  भाऊराव चव्हाण कारखान्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील कारखाना चालवायला घेवून चार युनिट तयार केले. चारचा आकडा शुभ नसून पाचवा गोदावरी मनार साखर कारखाना भाऊराव कारखान्याने चालवायला घेवून पाच पांडवांचे समीकरण जुळवून आणावे अशी मागणी आ. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी काहीही करा अन् गोदावरी कारखाना चालवायला घ्या, म्हणत वसंतराव चव्हाण यांच्या मागणीचे सर्मथन केले. तसेच शेतकर्‍यांनी ऊस उत्पादकतेकडे लक्ष देवून कारखान्याला स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले.  यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, सरचिटणीस संजय लहानकर, सभापती संजय बेळगे, कृउबा समितीचे सभापती माणिकराव जाधव, नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपसभापती सुनील अटकोरे, गंगाधर पाटील चाभरेकर, संजय लोणे, शंकरराव शिंदे, गंगाधरराव देशमुख, शंकरराव बारडकर, कारखान्याचे सर्व संचालकाची उपस्थिती होती. एकरी ११४ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल आनंदराव तिडके यांचा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी तिडके यांनी व सर्व उपस्थितांचे आभार कैलाश दाड यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकर्‍यांना रबी हंगामासाठी चार व उन्हाळी हंगामासाठी पाच पाण्याच्या पाळ्या देण्यात येतील असे उध्र्व पैनगंगा प्रकल्प कालवा समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. /(वार्ताहर)