शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शासनाने शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करावी

By admin | Updated: November 3, 2014 15:03 IST

दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी केली.

अर्धापूर : सोयाबीन, कापूस, ज्वारी पिके हातची गेल्याने सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत केली पाहिजे, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी केली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक १ गाळप हंगामाचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले, सभापती वंदना लहानकर उपस्थित होत्या.  यावेळी खा.अशोकराव चव्हाण म्हणाले, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे तीन युनिट कर्जमुक्त झाले असून चौथ्या युनिटच्या कर्जाची परतफेड चालू आहे. त्यामुळे नवीन पाचवा कारखाना चालवायला घेण्याएवढी आर्थिक बाजू भक्कम नाही. पण माझ्या मतदारसंघातील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी सर्वस्वी प्रयत्न करील असे सांगितले. २0१३-१४ च्या हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चार युनिटमध्ये १२ लाख ९३ हजार ४८३ मे. टन उसाचे गाळप यशस्वीरित्या पूर्ण केले. शेतकर्‍यांनी कारखान्याच्या ऊस लागवड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन गणपतराव तिडके यांनी प्रस्ताविकातून केले.  भाऊराव चव्हाण कारखान्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील कारखाना चालवायला घेवून चार युनिट तयार केले. चारचा आकडा शुभ नसून पाचवा गोदावरी मनार साखर कारखाना भाऊराव कारखान्याने चालवायला घेवून पाच पांडवांचे समीकरण जुळवून आणावे अशी मागणी आ. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी काहीही करा अन् गोदावरी कारखाना चालवायला घ्या, म्हणत वसंतराव चव्हाण यांच्या मागणीचे सर्मथन केले. तसेच शेतकर्‍यांनी ऊस उत्पादकतेकडे लक्ष देवून कारखान्याला स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले.  यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, सरचिटणीस संजय लहानकर, सभापती संजय बेळगे, कृउबा समितीचे सभापती माणिकराव जाधव, नगराध्यक्ष नासेरखान पठाण, उपसभापती सुनील अटकोरे, गंगाधर पाटील चाभरेकर, संजय लोणे, शंकरराव शिंदे, गंगाधरराव देशमुख, शंकरराव बारडकर, कारखान्याचे सर्व संचालकाची उपस्थिती होती. एकरी ११४ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल आनंदराव तिडके यांचा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी तिडके यांनी व सर्व उपस्थितांचे आभार कैलाश दाड यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकर्‍यांना रबी हंगामासाठी चार व उन्हाळी हंगामासाठी पाच पाण्याच्या पाळ्या देण्यात येतील असे उध्र्व पैनगंगा प्रकल्प कालवा समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. /(वार्ताहर)