शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गांधी चौकात विद्युत रोहित्राने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

हिंगोली: शहरातील गांधी चौक येथे दुपारच्यावेळेला विद्युत रोहित्राला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक प्रमुखाने तत्परता दाखवत बंबाद्वारे आग आटोक्यात ...

हिंगोली: शहरातील गांधी चौक येथे दुपारच्यावेळेला विद्युत रोहित्राला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक प्रमुखाने तत्परता दाखवत बंबाद्वारे आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

१ मार्चपासून शहरात टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे या भागात दुकाने उघडी नाहीत. एरव्ही हा भाग वर्दळीचा असतो. ३ मार्च रोजी अग्निशामक प्रमुख बाळू बांगर हे कामानिमित्त गांधी चौक येथे आले होेते. विद्युत रोहित्राला आग लागल्याचे यावेळी त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गांधी चौकातील वीज रोहित्राला आग लागल्याची सूचना केली आणि लाईनमन लवकर पाठविण्याची विनंतीही केली.

याचबरोबर अग्निशमन विभागालाही गाडी घेऊन येण्याचे आदेशित केले. दोन्ही विभागांतील कर्मचारी तातडीने गांधी चौक येथे हजर झाले. तोपर्यंत पावणेतीन वाजले होते. तत्परता दाखवत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गांधी चौक परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. दुसरीकडे अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत रोहित्रावरील आग तातडीने विझविली.

गांधी चौक येथील विद्युत रोहित्राला लागलेली आग तातडीने विझविली गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

फोटो