या अभियानात ११ हजार १२ राम सेवकांनी सहभाग घेऊन जिल्हातील प्रत्येक वस्ती, तांड्यापर्यंत पोहोचून १.२४ लाख कुटुंबांशी संपर्क केला. मंदिर निर्माणांसाठी जिल्ह्यातून एकूण १ कोटी १२ लाख ८७ हजार २०९ रुपये निधी समर्पण करण्यात आला. सदरील निधी रोख, धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून श्री राममंदिर न्यासच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
अभियानाच्या समारोपप्रसंगी अभियान सहमंत्री ॲड. पंकज जोशी म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक सद्भाव जोपासण्याचे विशेष कार्य पूर्ण झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अभियानाला स्वतःहून स्वीकारले. यावेळी सहभागी सेवकांचा सत्कार करण्यात आला. अभियान राबविताना शहर व ग्रामीण भागांमध्ये शोभायात्रा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी इंद्रजितसिंह बैस, सुनील पुराणिक, प्रा. संदीप गोरे, डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, राजेंद्र हलवाई आदी उपस्थित होते.