शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चार टँकर सुरू; सात गावांचे प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात परंपरागत टंचाईग्रस्त असलेल्या गावांना यंदाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, टँकरची निविदाच मंजूर न झाल्याने सात ...

हिंगोली : जिल्ह्यात परंपरागत टंचाईग्रस्त असलेल्या गावांना यंदाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, टँकरची निविदाच मंजूर न झाल्याने सात गावांचे टँकरचे प्रस्ताव पडून आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सध्या चार टँकरद्वारे तीन गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बळसोंडला दोन, खापरखेडा पानबुडेवस्तीला १ तर डिग्रसवाणी येथे एक टँकर सुरू आहे. मात्र, अजूनही सात गावांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात अजूनही काहीच निर्णय झाला नाही. जिल्हा प्रशासनाने टँकरचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकार घडला. प्रशासनाने निविदा काढल्यानंतर चार निविदा आल्या होत्या. त्यापैकी दोन अपात्र ठरल्या. किमान तीन तरी पात्र ठरणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने ही प्रक्रिया तेथेच संपुष्टात आली. आता नव्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता या प्रक्रियेतून पुन्हा कंत्राटदार निवडावा लागणार आहे. शासकीय टँकर चारच असल्याने तीन गावांना पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, लोहरा, हातमाली, सावरखेडा, अंधारवाडी, माळधावंडा, पेडगाववाडी व जयपूर या टंचाईग्रस्त गावांबाबत टँकर नसल्याने काहीच निर्णय होऊ शकला नाही. आता ही निविदा मंजूर व्हायला जून उजाडला, तर तोपर्यंत या गावांना टंचाईच्या झळा सोसण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.

यंदा तशीही कमी गावांत टंचाई आहे. त्यामुळे केवळ ६२ गावांतच अधिग्रहण करावे लागले. मात्र, पारंपरिक टंचाईग्रस्त गावांत दरवर्षीच टँकर द्यावे लागते. या गावांची टँकरमुक्ती जलयुक्त शिवार योजनेनंतरही झाली नाही. यातील काही गावांची तर निवडच झाली होती की नाही, हा प्रश्न आहे.