शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
5
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
6
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
7
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
8
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
9
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
10
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
11
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
12
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
13
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
14
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
15
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
16
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
18
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
19
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
20
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुझं माझं जमेना अन् आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली : विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यांसह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, योग्य ...

हिंगोली : विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यांसह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, योग्य समुपदेशन केल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समुपदेशन केल्याने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारीरिक व मानसिक त्रास आदी कारणांमुळे कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. हे वाद विकोपाला पोहोचत असल्याने अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. मात्र, याचे परिणाम जोडप्यांसह लहान मुलांनाही भोगावे लागतात. रागाच्या भरात अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न येथील भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या काळात ३५९ प्रकरणे भरोसा सेलकडे आली होती. योग्य समुपदेशनामुळे १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

जिल्ह्यात येथे आहे भरोसा सेल

येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेल कक्ष उभारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे प्रमुख म्हणून काम पाहतात. तसेच पोहेकॉ शेख इस्माईल, मपोहे सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोलारे, वर्षा शिंदे आदी कर्मचारी वर्ग नियुक्त केला आहे. तर सोनल सुलभेवार, संतोष दहातोंडे, स्वेता लाटे आदी समुपदेशक म्हणून उपलब्ध करून दिले आहेत. कायदेशीर मदत, संरक्षण अधिकारी, बाल समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सेवाही पुरविली जाते.

बायको माहेरी जाते म्हणून...

येथील भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीत पत्नी माहेरी जाते, सारखं मोबाईलवर बोलते, उद्धट बोलते आदी कारणे नमूद आहेत. यातून कौटुंबिक वाद निर्माण होऊन अशी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत जातात.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. परंतु, जोडप्यांना योग्य समुपदेशन केल्यास त्यांच्यातील गैरसमज दूर होतात. मागील आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल प्रमुख, हिंगोली

आठ महिन्यांत भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे - ३५९

प्रकरणात घडवून आणला समेट - १२६