शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

आधी तुझं माझं जमेना अन् आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली : विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यांसह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, योग्य ...

हिंगोली : विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यांसह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, योग्य समुपदेशन केल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समुपदेशन केल्याने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारीरिक व मानसिक त्रास आदी कारणांमुळे कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. हे वाद विकोपाला पोहोचत असल्याने अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. मात्र, याचे परिणाम जोडप्यांसह लहान मुलांनाही भोगावे लागतात. रागाच्या भरात अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न येथील भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या काळात ३५९ प्रकरणे भरोसा सेलकडे आली होती. योग्य समुपदेशनामुळे १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

जिल्ह्यात येथे आहे भरोसा सेल

येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेल कक्ष उभारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे प्रमुख म्हणून काम पाहतात. तसेच पोहेकॉ शेख इस्माईल, मपोहे सुनीता शिंदे, मपोशि स्वाती डोलारे, वर्षा शिंदे आदी कर्मचारी वर्ग नियुक्त केला आहे. तर सोनल सुलभेवार, संतोष दहातोंडे, स्वेता लाटे आदी समुपदेशक म्हणून उपलब्ध करून दिले आहेत. कायदेशीर मदत, संरक्षण अधिकारी, बाल समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सेवाही पुरविली जाते.

बायको माहेरी जाते म्हणून...

येथील भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीत पत्नी माहेरी जाते, सारखं मोबाईलवर बोलते, उद्धट बोलते आदी कारणे नमूद आहेत. यातून कौटुंबिक वाद निर्माण होऊन अशी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत जातात.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. परंतु, जोडप्यांना योग्य समुपदेशन केल्यास त्यांच्यातील गैरसमज दूर होतात. मागील आठ महिन्यांत १२६ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल प्रमुख, हिंगोली

आठ महिन्यांत भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे - ३५९

प्रकरणात घडवून आणला समेट - १२६