शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

...अखेर स्वस्त धान्य दुकानदारांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्याच्या वाहतुकीचे मागील काही दिवसांपासून तीनतेरा वाजले आहेत. वेळेत माल दुकानात पोहोचत नसल्याने दुकानदारांनी आ. तान्हाजी ...

हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्याच्या वाहतुकीचे मागील काही दिवसांपासून तीनतेरा वाजले आहेत. वेळेत माल दुकानात पोहोचत नसल्याने दुकानदारांनी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यामार्फत पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदींकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही, या महिन्यात २० तारखेपर्यंत धान्याची उचल सुरूच झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे भिकुलाल बाहेती, अशोक काळे, नवनाथ कानबाळे, गौरी, फारूक पठाण आदींनी निवेदने देऊन गोरगरिबांना धान्य वेळेत न मिळाल्यास ओरड होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावरून पुन्हा प्रशासनाने हालचाली गतिमान करत १५ दिवसांसाठी नवा कंत्राटदार नेमला आहे. त्यांचे कामही सुरू झाले आहे. मात्र, आता आठ दिवसांत धान्य दुकानांपर्यंत पोहोचवणे तसेच ते वाटप करण्याची कवायत करावी लागणार आहे.

याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे भिकुलाल बाहेती म्हणाले, नवीन कंत्राटदार नेमल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, ही समस्या कायमची सुटावी, अशी आमच्या संघटनेची अपेक्षा आहे. यामुळे लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळत नाही. शिवाय, त्याच महिन्यात धान्यवाटप करायचे असल्याने पुन्हा नियतन कमी होते. असे घडू नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

पुरवठा विभागाला वाली नाही

हिंगोलीच्या पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची आता सेलू येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी अजून कोणाचीही नियुक्ती झाली नाही. तूर्त प्रशासन पदभारावर कारभार चालवेल. मात्र, पूर्णवेळ अधिकाऱ्याशिवाय येथील कामकाज व्यवस्थित चालत नाही. इतरही काही जणांच्या बदल्या झाल्या आहेत. हीच बोंब हिंगोली येथील तहसीलच्या पुरवठा विभागात असून येथेही पूर्णवेळ नायब तहसीलदार नसल्याने ओरड होत आहे. सध्या प्रभारावर कारभार चालविला जात आहे.

नाव बदलण्याची अडचण

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमध्ये रेशनकार्डवरील नावे वगळणे किंवा वाढविणे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. मागील काही दिवसांपासून या ठिकाणचे सर्व ऑपरेटर काढून टाकल्याने ही गर्दी तहसील किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडे वळत आहे. यामुळे हा नवा प्रश्न समोर येत आहे.