शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अतिराग, कुटुंबकलह मोठे कारण ; जिल्ह्यात २३५ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:04 IST

हिंगोली: २०२० या वर्षात १४१ महिला तर ९४ पुरुष बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिमेद्वारे ...

हिंगोली: २०२० या वर्षात १४१ महिला तर ९४ पुरुष बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिमेद्वारे ९१ जणांचा शोध लावला. यात पुरुष ३९ तर ५२ महिलांचा समावेश आहे.

अतिराग, कुटुंबकलह, किरकोळ भांडण, संतुलन बिघडणे आदी कारणांमुळे जिल्ह्यातील २३५ जणांनी घर सोडले होते. यानंतर घर सोडून गेलेल्या पुरुष व महिलांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, कुठेही आपले आप्तजन सापडत नाहीत, हे पाहून अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले. नातेवाईकांचा अर्ज आल्यानंतर बेपत्ता झालेल्या पुरुष व महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच नातेवाईकांनाही पोलिसांनी धीर दिला होता. घर सोडून जाण्याचे कारण विचारले असता बहुतांश नातेवाईकांनी घरकुती कलह, संतुलन बिघडणे, घरात विनाकारण वाद करणे, कोणत्याही गोष्टीवरून वाद करत किरकोळ भांडण करत घर सोडल्याचे सांगितले. नातेवाईकांनी पोलिसांचे दार ठोठावल्यामुळे पोलिसांनी बेपत्ता पुरुष आणि महिलांचा शोध लावण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत ९१ जण सापडले. सापडलेल्या महिला व पुरुषांची समजूत काढून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. उर्वरित बेपत्ता १४४ महिला व पुरुषांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

घर सोडून जाण्याचे कारण

अतिराग, कुटुंबकलह, संतुलन बिघडणे, किरकोळ भांडणे आदी कारणे घर सोडून जाण्यास कारणीभूत आहेत. तसेच इतर कारणांमुळे काहींनी घर सोडले. नातेवाईकांचा अर्ज आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि ९१ जणांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. बेपत्ता झालेल्यांमध्ये १४१ महिला तर ९४ पुरुषांचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी उदय खंडेराय यांनी सांगितले.