शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत ...

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचार व मतदान होईपर्यंत उमेदवार व पॅनलप्रमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान मागत आहेत. निवडून आल्यावर आम्ही गावचा सर्वांगीण विकास करू, तुमची कोणतीही कामे असू द्या, आम्हाला सांगा ती करू अशी पोकळ आश्वासने उमेदवार देत आहेत. तसेच चाणाक्ष मतदारही आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे म्हणत वेळ निभावून घेत आहेत. तसेच प्रत्येक घरामध्ये निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारयादी चाळण्याकडे लक्ष दिलेले आहे. गावाबाहेर किती मतदार आहेत, त्यांना कसे आणायचे याबाबतची आखणीही सुरु आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे मतदारांना सांगत आहेत. सध्या हॉटेल, ढाब्यावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तसेच चौकाचौकांत भेटी देत उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. उमेदवारांचे समर्थक मात्र उमेदवारांना तुम्हीच निवडून येता असे सांगून उमेदवाराला खूश करीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ४ जानेवारी अंतिम दिवस असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे कळणार आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही काहीजण सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केलेली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत. दिवसा गावात निवडणुकीच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत. आमचाच पॅनल निवडून येतो असे प्रत्येक पॅनलप्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक सांगत आहेत. अनेक गावांत दुरंगी व तिरंगी लढतीही रंगण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणी, गहू व हरभऱ्याला पाणी देणे, तुरीची काढणी करणे आदी कामे करीत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या गावांतच बिनविरोध निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. सर्व पॅनलप्रमुखांनाही कार्यकर्ते सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. मात्र, मतदारराजाला या निवडणुकीत चांगलाच भाव आलेला आहे. स्वच्छ चारित्र्य व विकासाभिमुख उमेदवारांनाच मतदार निवडून देतील, अशी अपेक्षा प्रत्येकाला वाटत आहे. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही जण कामे सोडून उमेदवारांच्या मागे प्रचारासाठी धावून येत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मात्र चांगलाच भाव आलेला आहे.