शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत ...

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचार व मतदान होईपर्यंत उमेदवार व पॅनलप्रमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान मागत आहेत. निवडून आल्यावर आम्ही गावचा सर्वांगीण विकास करू, तुमची कोणतीही कामे असू द्या, आम्हाला सांगा ती करू अशी पोकळ आश्वासने उमेदवार देत आहेत. तसेच चाणाक्ष मतदारही आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे म्हणत वेळ निभावून घेत आहेत. तसेच प्रत्येक घरामध्ये निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारयादी चाळण्याकडे लक्ष दिलेले आहे. गावाबाहेर किती मतदार आहेत, त्यांना कसे आणायचे याबाबतची आखणीही सुरु आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे मतदारांना सांगत आहेत. सध्या हॉटेल, ढाब्यावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तसेच चौकाचौकांत भेटी देत उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. उमेदवारांचे समर्थक मात्र उमेदवारांना तुम्हीच निवडून येता असे सांगून उमेदवाराला खूश करीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ४ जानेवारी अंतिम दिवस असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे कळणार आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही काहीजण सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केलेली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत. दिवसा गावात निवडणुकीच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत. आमचाच पॅनल निवडून येतो असे प्रत्येक पॅनलप्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक सांगत आहेत. अनेक गावांत दुरंगी व तिरंगी लढतीही रंगण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणी, गहू व हरभऱ्याला पाणी देणे, तुरीची काढणी करणे आदी कामे करीत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या गावांतच बिनविरोध निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. सर्व पॅनलप्रमुखांनाही कार्यकर्ते सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. मात्र, मतदारराजाला या निवडणुकीत चांगलाच भाव आलेला आहे. स्वच्छ चारित्र्य व विकासाभिमुख उमेदवारांनाच मतदार निवडून देतील, अशी अपेक्षा प्रत्येकाला वाटत आहे. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही जण कामे सोडून उमेदवारांच्या मागे प्रचारासाठी धावून येत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मात्र चांगलाच भाव आलेला आहे.