शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत ...

ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचार व मतदान होईपर्यंत उमेदवार व पॅनलप्रमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान मागत आहेत. निवडून आल्यावर आम्ही गावचा सर्वांगीण विकास करू, तुमची कोणतीही कामे असू द्या, आम्हाला सांगा ती करू अशी पोकळ आश्वासने उमेदवार देत आहेत. तसेच चाणाक्ष मतदारही आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे म्हणत वेळ निभावून घेत आहेत. तसेच प्रत्येक घरामध्ये निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारयादी चाळण्याकडे लक्ष दिलेले आहे. गावाबाहेर किती मतदार आहेत, त्यांना कसे आणायचे याबाबतची आखणीही सुरु आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे मतदारांना सांगत आहेत. सध्या हॉटेल, ढाब्यावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तसेच चौकाचौकांत भेटी देत उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. उमेदवारांचे समर्थक मात्र उमेदवारांना तुम्हीच निवडून येता असे सांगून उमेदवाराला खूश करीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ४ जानेवारी अंतिम दिवस असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे कळणार आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही काहीजण सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केलेली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत. दिवसा गावात निवडणुकीच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत. आमचाच पॅनल निवडून येतो असे प्रत्येक पॅनलप्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक सांगत आहेत. अनेक गावांत दुरंगी व तिरंगी लढतीही रंगण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणी, गहू व हरभऱ्याला पाणी देणे, तुरीची काढणी करणे आदी कामे करीत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या गावांतच बिनविरोध निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. सर्व पॅनलप्रमुखांनाही कार्यकर्ते सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. मात्र, मतदारराजाला या निवडणुकीत चांगलाच भाव आलेला आहे. स्वच्छ चारित्र्य व विकासाभिमुख उमेदवारांनाच मतदार निवडून देतील, अशी अपेक्षा प्रत्येकाला वाटत आहे. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही जण कामे सोडून उमेदवारांच्या मागे प्रचारासाठी धावून येत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मात्र चांगलाच भाव आलेला आहे.