शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

गतिमान हालचालींमुळे राजकीय लॉकडाऊन उठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

जि.प.सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासापासून गतिमान झालेल्या या हालचालींनंतर आता इतर राजकीय वाद समोर येऊ लागले आहेत. भाजपमधील दुही ...

जि.प.सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासापासून गतिमान झालेल्या या हालचालींनंतर आता इतर राजकीय वाद समोर येऊ लागले आहेत. भाजपमधील दुही जशी बैठकीच्या निमित्ताने समोर आली. विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव व आ. तान्हाजी मुटकुळे यांचा गट एकमेकांना पाण्यात पाहण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर आ. मुटकुळे यांनी अविश्वासाच्या विरोधात न मतदान केल्याने जि.प. गटनेत्या पुष्पा थोरात यांच्या मतदारसंघातील कामांबाबत पत्रही देऊन टाकले. राष्ट्रवादीतील वाद तर आहेच. आ.राजू नवघरे यांचा वाढता वरचष्मा लक्षात घेता आता सभापती निवडीच्या वेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची भूमिका काय राहते? हे पाहणे रंजक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीतील वाद समोर येतील, असे दिसते.

शिवसेनेच्याही गोटात काही सगळेच आलबेल आहे, असे नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. त्यात खा.हेमंत पाटील यांचेच छायाचित्र गायब असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तर सभापतींवरील अविश्वासाच्या वेळी शिवसेनेचेच तब्बल चार सदस्य गैरहजर राहिल्याने येथे वाद आहेत, हे समोर आले असून मध्यवर्ती कार्यालयाला त्याची दखल घ्यावी लागली. एवढेच नव्हे, तर वसमत विधानसभेत जुने व नवे असा वाद सुरू झाला असून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनीच या वादाला फोडणी दिल्याने येथेही कधी भडका उडेल, हे सांगणे अवघड आहे.

काँग्रेस पुन्हा त्याच मार्गावर

हिंगोली जिल्ह्यात स्व.खा.राजीव सातव व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गटातटाचे राजकारण नवे नाही. मागील सहा -सात वर्षांत त्याचा मोठा राजकीय फटका पक्षाने सोसला. अजूनही काँग्रेस त्याच मार्गावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही गटांनी मुंबईत जाऊन एकमेकांच्या उखाळ्या-पाकाळ्या केल्या. पक्षश्रेष्ठींनी मात्र दोघांनाही दाद न देता सज्जड दम भरला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करा त्यानंतर पाहू, असा श्रद्धा व सबुरीचा सल्ला दिला.

पक्षीय वादांचीही ठिणगी

हिंगोली नगरपालिकेत नाईलाजाने का होईना मात्र नगराध्यक्ष भाजपचे बाबाराव बांगर तर उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण अशी विचित्र स्थिती आहे. तरीही हे दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जायच्या. आता न.प. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे या दोघांत श्रेयवादाचा कलगीतुरा रंगत आहे. महेश नवमीच्या दिवशी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या साक्षीने हे दोघे चांगलेच भडकले. प्रस्ताव राष्ट्रवादीच्याच काळात आले, मंजूरही होते. निधी फक्त एकदा भाजपच्या काळात आला. नंतर महाविकास आघाडीनेच दिला, असा चव्हाण यांचा युक्तिवाद होता. तर बांगर यांनी आमच्याच काळात या सगळ्या योजना मंजूर झाल्या. इतरही निधी मिळाला. शहराचा चेहरा आम्हीच बदलला, असे सांगून वरकडी केली. त्यामुळे घरी बसून प्रस्ताव मंजूर होत नाही. मंत्रालयात मीच आ. मुटकुळेंसोबत दारोदार फिरल्याचे चव्हाण यांनी सांगताच वाद भडकला होता. न.प. निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडू लागली आहे.