शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची रिपरिप; सोयाबीनचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर गुरुवारी पावसाची रिपरिप सुरू असताना कौठा येथील आसना नदीला पूर आला. एकंदर पावसामुळे सोयाबीनचे ...

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर गुरुवारी पावसाची रिपरिप सुरू असताना कौठा येथील आसना नदीला पूर आला. एकंदर पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी कोंबही फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मागच्या सहा दिवसांपासून तिळाची, तर दोन दिवसांपासून सोयाबीनची काढणी सुरू आहे. परंतु, सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन काढणी थांबली आहे. काही ठिकाणी काढणी झालेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वसमत तालुक्यातील कौठा येथील आसना नदीला पूर आला असून, या नदीवर असलेल्या पुलालगत पाणी आले होते. बासंबा, पारडा, पिंपरखेड, भोगाव, सायाळ, सोडेगाव, जामगव्हाण, नांदापूर, हारवाडी, कंजारा, करंजी, विरेगाव, नर्सी नामदेव, कळमनुरी, वसमत, कुरुंदा, जवळा बाजार, कहाकर (बु), बटवाडी, ताकतोडा, वरखेडा, औंढा नागनाथ, शिरडशहापूर, आदी सर्वदूर भागात पावसाने हजेरी लावली.

सकाळच्या वेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली होती. परंतु, अचानक दुपारच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी काढणी केलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कॅप्शन: गुरुवारी कौठा येथील आसना नदीला पूर आला असून पुलालगत पाणी आले होते. फोटो २१

नर्सी परिसरात काढणी झालेल्या सोयाबीनला सततच्या पावसामुळे असे कोंब फुटले आहे. फोटो २२