शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

चालक - वाहकांची रात्र डासांसोबत एस. टी.तच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान ...

जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांची संचारबंदी केली होती. या दरम्यान, तिन्ही आगारातील एस. टी. बसेस बंदच होत्या. या सात दिवसांमध्ये मात्र डासांपासून चालक - वाहकांची सुटका झाली. परंतु परजिल्ह्यातील एस. टी. बसेस सुरू होत्या. एस. टी. सुरु झाल्याने आता मुक्कामी राहणाऱ्या चालक - वाहकांना डासांसोबत एस. टी. बसेसमध्ये निद्रा घ्यावी लागणार आहे.

खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची जेवण व चहा-पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु, तसे काही होताना दिसून येत नाही. चालक - वाहक गेल्या कित्येक वर्षांपासून एस. टी.मध्येच डासांसोबत रात्र काढतात. सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या ७, तर वसमत आगाराच्या ९ बसेस मुक्कामी आहेत. कळमनुरी आगाराने ग्रामीण भागात अजून तरी मुक्कामी बसेस सुरु केलेल्या नाहीत.

प्रतिक्रिया

अनेक समस्यांचा करावा लागतो सामना

ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस. टी. महामंडळाच्या वतीने बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु मुक्कामी राहणाऱ्या गावांमध्ये चालक - वाहकांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. बसमधील आसन व्यवस्थेवरच रात्र काढावी लागत आहे.

सहा गावांमध्ये अजूनही शौचालय नाही

वसमत आगारातून ९ ठिकाणी मुक्कामी बसेस सोडण्यात येत आहेत. ९ गावांपैकी पिंपराळा, नर्सी, बाराशिव या गावांमध्येच शौचालयाची व्यवस्था आहे. धानोरा, वारंगा, सिंदगी, कानोसा, येलदरी, लोहरा येथे मात्र शौचालयाची व्यवस्था नाही. यामुळे चालक - वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे दुसराच आजार उद्‌भवेल, याची भीती चालक - वाहकांना आहे.

कोरोनामुळे पुढे येण्यास कोणीही धजत नाही

२३ मार्च २०२०पासून कोरोना आजाराने सर्वत्र डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वच जण दूरदूर राहू लागले आहेत. जेवण सोडा, साधे पाणीही चालक - वाहकांना ग्रामीण भागात मुक्कामाच्या ठिकाणी मिळत नाही. कोरोना आजारापासून चालक - वाहकांचे संरक्षण व्हावे म्हणून महामंडळाने मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.

भीती वाटते ती कोरोना व्हायची

कोरोना होऊ नये म्हणून सर्वच प्रवाशांना मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जातात. परंतु, काही प्रवासी असे असतात की, जे मास्क घालतच नाहीत. वेळ कधी सांगून येत नसते. कोरोना होऊ नये म्हणून मुक्कामाच्या ठिकाणी काळजी घेत असतो. परंतु, कोरोनाची भीती वाटत आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार ग्रामीण भागात एस. टी. महामंडळ बसेस सुरु करते. परंतु, म्हणावी तशी व्यवस्था चालक - वाहकांची केली जात नाही. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सध्या कोरोना आजार असल्याने थोडी भीती वाटत आहे. ग्रामपंचायतीने कोरोना काळात तरी चालक आणि वाहकांची काळजी करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

- रा. य. मुपडे, आगारप्रमुख, वसमत