शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

५२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले कम्फर्म : १३ सप्टेंबरपासून पहिली प्रवेश फेरी सुरू हिंगोली : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी ...

५२४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले कम्फर्म : १३ सप्टेंबरपासून पहिली प्रवेश फेरी सुरू

हिंगोली : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी नाही मिळाली तरी रोजगाराची संधी तरी उपलब्ध होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे असून, यावर्षी पहिल्यांदाच तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२४ जणांनी अर्ज कम्फर्म केले आहेत.

शासकीय नोकरीच्या संधी कमी होत चालल्या आहेत, तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे शासकीय नोकरीच्याच केवळ मागे न लागता रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे व नोकरीची संधीही मिळाली पाहिजे, या उद्देशाने अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळले आहेत. यापूर्वी पॉलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या व क्षेत्रांत कार्य करीत आहेत. त्यामुळे याहीवर्षी विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळले आहेत. दरम्यान, पॉलिटेक्निकसाठी ७ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपली असून, १३ सप्टेंबरपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू झाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत विकल्प अर्ज भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर १८ ला जागावाटप होणार असून, १९ ते २३ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर, २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे, तर १३ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रोजगाराची व नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेशासाठी झगडावे लागणार असल्याचे चित्र आहे.

सिव्हिल, संगणकाकडे विद्यार्थ्यांचा ओढा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा सिव्हिल अभ्यासक्रमाकडे आहे. मात्र, जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमध्ये हा अभ्यासक्रम नसल्याने इतर जिल्ह्यांत जावे लागत आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेत असले तरी जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा ओंढा कॉम्प्युटरकडे असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय, तसेच निमशासकीय क्षेत्रात रोजगारांच्या संधी आहेत. दोन्हीतही संधी हुकल्या तर स्वत:चा व्यवसाय टाकू शकतो. यातून नवनवीन शिकता येते. आपल्या क्षमतांना वाव मिळतो.

-राजकुमार आम्ले, गिरामवाडी

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय नोकरीच्या संधी आहेत, तसेच कंपनीमध्येही रोजगार मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हवे असलेले अभ्यासक्रम हिंगोलीमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळेच नांदेड येथे जाऊन सिव्हिलला प्रवेश घ्यावा लागत आहे.

-मो. कैफ शेख फारुख बागवान, हिंगोली

पॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी बेरोजगार राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निकडे वाढला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत.

-डॉ. अशोक उपाध्याय, प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक, हिंगोली

सिव्हिल अभ्यासक्रमाची आवश्यकता

हिंगोली जिल्ह्यात एक खाजगी, तर एक शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आहे. शासकीय पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिकल, असे तीन अभ्यासक्रम आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल सिव्हिल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत, असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.