शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत ...

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर पालिकेकडून पुरवठा होणारे पाणीही गढूळ असल्यासारखे दिसत आहे. धरणात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा रंग त्यालाही दिसत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले हे पाणीही पिवळसर रंगाचे असल्याने ते मातीमिश्रित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे क्लोरिनेशन झालेले असले तरीही उकळून प्यायल्यास इतर आजारांचा धोका टळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काळ पाणी उकळून प्यायल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येणे शक्य आहे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करावे. हातपंपांच्या आजूबाजूला घाण, उकीरडा साठू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ, अतिसार,

कावीळ झाल्यास ताप येणे, पोट दुखणे, मळमळ होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात.

हळूहळू आजार वाढत गेल्यास डोळ्यात पिवळेपण दिसते.

अतिसारात तर पोटदुखी, जुलाब, उलटी ही सामान्य लक्षणे दिसून येतात.

टायफॉईडमध्ये एक किंवा दोन दिवसाआड ताप येतो, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

सध्या अतिवृष्टीमुळे दूषित पाणी पिण्यात येऊ शकते. त्यामुळे ते उकळून व गाळून प्यावे. शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी दिली.

शहराला रोज चार ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यात विविध भागातील ८ टाक्यांवरून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तसा टाक्यांपर्यंत रोज आठ ते दहा एमएलडीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले असते. याशिवाय खासगी स्त्रोतांतूनही नागरिक पाणी उपसा करून त्याचा वापर करतात. काही भागात फिल्टरचे पाणीही नागरिक घेतात. एका नागरिकास दिवसाकाठी पिण्यास पाच ते सात लिटर पाणी लागते.