शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत ...

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर पालिकेकडून पुरवठा होणारे पाणीही गढूळ असल्यासारखे दिसत आहे. धरणात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा रंग त्यालाही दिसत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले हे पाणीही पिवळसर रंगाचे असल्याने ते मातीमिश्रित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे क्लोरिनेशन झालेले असले तरीही उकळून प्यायल्यास इतर आजारांचा धोका टळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काळ पाणी उकळून प्यायल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येणे शक्य आहे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करावे. हातपंपांच्या आजूबाजूला घाण, उकीरडा साठू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ, अतिसार,

कावीळ झाल्यास ताप येणे, पोट दुखणे, मळमळ होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात.

हळूहळू आजार वाढत गेल्यास डोळ्यात पिवळेपण दिसते.

अतिसारात तर पोटदुखी, जुलाब, उलटी ही सामान्य लक्षणे दिसून येतात.

टायफॉईडमध्ये एक किंवा दोन दिवसाआड ताप येतो, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

सध्या अतिवृष्टीमुळे दूषित पाणी पिण्यात येऊ शकते. त्यामुळे ते उकळून व गाळून प्यावे. शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी दिली.

शहराला रोज चार ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यात विविध भागातील ८ टाक्यांवरून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तसा टाक्यांपर्यंत रोज आठ ते दहा एमएलडीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले असते. याशिवाय खासगी स्त्रोतांतूनही नागरिक पाणी उपसा करून त्याचा वापर करतात. काही भागात फिल्टरचे पाणीही नागरिक घेतात. एका नागरिकास दिवसाकाठी पिण्यास पाच ते सात लिटर पाणी लागते.