शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या ...

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसाही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. सोमवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात ९.४० मिमी. पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात ४.००, कळमनुरी ३.८०, वसमत ०.५०, औंढा नागनाथ १७.७०, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त २६.२० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहिली होती. त्यानंतर मात्र अद्याप नदीला एकही मोठा पूर आला नाही. जिल्ह्यातील तलाव, बंधारे अजूनही तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी झाला होता १२०.४८ टक्के पाऊस

जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५८.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. याची टक्केवारी १२०.४८ एवढी झाली होती. यावर्षी अधून-मधून पाऊस होत असला तरी आतापर्यंत ४६५.१० मिमी पाऊस झाला आहे. मान्सून कालावधी संपण्यासाठी आणखी दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला तर वार्षिक सरासरी गाठली जाईल. सध्या पावसाची शक्यता लक्षात घेता आगामी काळात हा पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)

तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी

हिंगोली ८६७.९० ४५१.६० ५२.०३

कळमनुरी ७९५.४० ४८०.१० ६०.३६

वसमत ८२४.०० ४५२.३० ५४.८९

औंढा ७३६.१० ५४०.७० ७३.४५

सेनगाव ७२९.७० ४३१.२० ५९.०९

एकूण ७९५.३० ४६५.१० ५८.४८