शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या ...

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसाही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. सोमवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात ९.४० मिमी. पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात ४.००, कळमनुरी ३.८०, वसमत ०.५०, औंढा नागनाथ १७.७०, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त २६.२० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहिली होती. त्यानंतर मात्र अद्याप नदीला एकही मोठा पूर आला नाही. जिल्ह्यातील तलाव, बंधारे अजूनही तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी झाला होता १२०.४८ टक्के पाऊस

जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५८.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. याची टक्केवारी १२०.४८ एवढी झाली होती. यावर्षी अधून-मधून पाऊस होत असला तरी आतापर्यंत ४६५.१० मिमी पाऊस झाला आहे. मान्सून कालावधी संपण्यासाठी आणखी दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला तर वार्षिक सरासरी गाठली जाईल. सध्या पावसाची शक्यता लक्षात घेता आगामी काळात हा पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)

तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी

हिंगोली ८६७.९० ४५१.६० ५२.०३

कळमनुरी ७९५.४० ४८०.१० ६०.३६

वसमत ८२४.०० ४५२.३० ५४.८९

औंढा ७३६.१० ५४०.७० ७३.४५

सेनगाव ७२९.७० ४३१.२० ५९.०९

एकूण ७९५.३० ४६५.१० ५८.४८