शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

महाशिवरात्रीच्या दिवशी फळांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

हिंगोली: इतर फळांच्या तुलनेत रताळी या फळाची आवक वाढल्याने महाशिवरात्रीला रताळीचा भाव घसरल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळाले. दरवर्षी ३० ते ...

हिंगोली: इतर फळांच्या तुलनेत रताळी या फळाची आवक वाढल्याने महाशिवरात्रीला रताळीचा भाव घसरल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळाले. दरवर्षी ३० ते ३५ रुपये किलोने विक्री होणारी रताळी २० रुपये किलोने विक्री झाले.

महाशिवरात्र पाच-सहा दिवसांवर येऊन असता रताळी विक्रीसाठी बाजारात येत असतात. परंतु, यावेळेस महाशिवरात्र दोन दिवसांवर राहिली असताना रताळी बाजारात दाखल झाले होते. शहरातील चौकाचौकांमध्ये रताळीचे गाडे उभे असल्याचे पाहायला मिळाले. उत्पन्न जास्त असल्याने २० रुपये किलोने रताळे विक्री झाले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन जाणवायला सुरुवात झाली आहे. अंगूर, टरबूज, खरबूज, चिकू, सफरचंद, अननस, मोसंबी, नारळ पाणी आदी फळांचे गाडे वर्दळची रस्ते व चौकाचौकात थाटली गेली आहेत. अंगूर, चिकूची आवक वाढली असली तरी इतर फळांची आवक मात्र अजूनही वाढली नाही. त्यामुळे महाशिवरात्रीला फळांना सर्वच फळांना चांगलीच मागणी होती. महाशिवरात्रीचा उपवास आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांकडून फळांना मागणी होत होती. कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढत असतानाही महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.

महाशिवरात्री बाजारपेठेत अंगूर ८० रुपये किलो, टरबूज २५ रुपये, चिकू ६० रुपये किलो, खरबूज ३० रुपये किलो, नारळ पाणी ४० रुपयास एक, केळी ३० रुपये डझनप्रमाणे विक्री झाली.

शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेडनाका, बसस्थानक परिसर, रिसाला चौक, खटकाळी, औंढा रोड आदी वर्दळीच्या ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी फळांचे गाडे उभे केले होते.

बॉक्स

दोन-तीन दिवसांपासून अंगूर फळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाची तीव्रता आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेता छोट्या विक्रेत्यांनी अंगूरची खरेदी केली आहे. जे छोटे व्यापारी सफरचंद विकायचे ते आता ग्राहकांची मागणी पाहून अंगूर विकायला लागले आहेत. १०-१२ दिवसांपूर्वी अंगूरची आवक कमी होती. त्यावेळेस ६० रुपये किलोने अंगूर विक्री होत होते. गुरुवारी महाशिवरात्र व वाढते उन्ह पाहता अंगूर ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे विक्री झाले. ग्राहकांकडून अंगूरला चांगली मागणी होती.

- शकील बागवान, फळ विक्रेता