शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
2
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
3
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
4
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
5
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
6
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
7
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
8
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
9
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
10
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
11
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
12
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
13
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
14
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
15
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
16
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
17
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
18
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
19
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
20
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
Daily Top 2Weekly Top 5

गावात सिमेंट रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

रस्त्यावर घाण पाणी हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे ...

रस्त्यावर घाण पाणी

हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे पाणी साचत असल्याने या भागातील नागरिकांना व वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच खड्डयांतील पाणी खूप दिवसांपासून साचले आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज गावापासून सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा रस्ता नव्याने केल्याने अनेक वाहने येथून भरधाव वेगाने धावत आहेत. वाहने वेगाने धावत असल्याने याठिकाणी अनेकदा अपघात होत आहेत. यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा आदी परिसरात काही दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील कौलांवरून वानरे उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वृक्ष लागवडीची गरज

हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटी वाळून जात आहेत. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे.

पुलाचे कठडे गायब

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील काही पुलाचे कठडे गायब झाले आहेत. या मार्गावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने धोका निर्माण होत आहे. पुलाचे लोखंडी कठडे गायब करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पाणीटंचाईच्या जाणवताहेत झळा

हिंगोली : तालुक्यातील अनेक गावांतील जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. पाणीसाठे आटत चालल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. सध्या थंडीचे दिवस आहे. आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची भटकंती वाढली आहे.

सौरदिवे बनले शोभेची वस्तू

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये सौरदिवे बसविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच सौर दिवे बंद पडत आहेत. बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ गावकऱ्यांना होत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

दुभाजकाची मागणी

कळमनुरी : शहरातील डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय ते बसस्थानक दरम्यान वाहनांची नेहमी वर्दळ असते. अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर दुभाजक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था

वसमत : येथून गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांचा अपघातही घडत आहे. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावी, अशी मागणी होते.