शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारातील वीजपुरवठा थकीत देयके असल्यामुळे महावितरण विभागाकडून खंडित करण्यात आलेला आहे.त्यामुळे ...

शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारातील वीजपुरवठा थकीत देयके असल्यामुळे महावितरण विभागाकडून खंडित करण्यात आलेला आहे.त्यामुळे मागील चार दिवसांपासून शेतशिवारातील पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांचे नुकसान होत आहेे. या संकटातमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह पिंपरखेड गावातील पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे गावात सायंकाळपासूनच अंधार पसरत आहे. याचबरोबर पायी ये जा करणाऱ्यांना अंधारामुळे काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना ठेचा लागत असल्याचे प्रकारही घडत आहे. वाहनधारक अंधारामुळे खड्ड्यात जात आहेत.

पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर, बोअर व हातपंपातील पाणी आटले असल्यामुळे बरेच ग्रामस्थ सकाळी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. गावातील बऱ्याच भागात पाणी मिळत नसल्यामुळे गावकरी शेजारील गावातून पाणी आणत आहेत. तसेच बरेच जण विकतचे पाणी आणताना दिसून येतात.

नाली करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील शाहूनगर, कमलानगर भागामध्ये नाल्या नसल्यामुळे अनेकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर जमा होत आहे. यामुळे नगरातील इतर नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. तसेच सांडपाणी रस्त्यावर साठत असल्यामुळे यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

हिंगोली : शहरातील जिल्हा न्यायालयातील स्वच्छतागृहात मोठी घाण झाली असल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. मागील वर्षभरापासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात न आल्याने या स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झालेली आहे. यामुळे या स्वच्छतागृहाचा वापर न करता अनेक जण बाहेरच लघुशंका करीत आहेत.

रामेश्वर तांडा - वारंगा रस्ता उखडला

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावातून वारंगा फाटाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचबरोबर रस्त्यातील गिट्टीही उघडी पडली असल्यामुळे रस्त्यावर नेहमी धुळीचे वातावरण राहत आहे.