शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ‘डिप्रेशन’ वाढविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने लोकांमधील डिप्रेशन वाढविल्याचे दिसून येत आहे. अशावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी मनाने गोळ्या घेण्याऐवजी तज्ज्ञ ...

हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने लोकांमधील डिप्रेशन वाढविल्याचे दिसून येत आहे. अशावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी मनाने गोळ्या घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गोळ्या वा इतर औषधी घ्यावीत, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक डोणेकर यांनी दिला आहे.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांचे कामधंदे बंद झाले आहेत, अनेकजण आहे त्या कामावरून घरी बसविले आहेत. अशावेळी त्यांच्यामध्ये डिप्रेशन येणे सहाजिकच, असे असताना त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. निराश होऊन कोणत्याही गोळ्या घेणे म्हणजे ते शरीरासाठी हानिकारच असते.

डिप्रेशन (उदासीनता) हे सौम्य, मध्यम आणि अतिशय तीव्र अशा तीन टप्प्यांमध्ये मोडले जाते. विशेष म्हणजे डिप्रेशन हे अनुवंशिक असते. कुणाला आईकडून, कुणाला वडिलांकडून तर कुणाला आजी-आजोबांच्या रक्तातून डिप्रेशन हे कोणत्याही मार्गाने येऊ शकते. त्यामुळे माणूस उदासीन बनतो. यामध्ये बाहेरील वलयही त्यास कारणीभूत असू शकते. यामध्ये कर्ज, व्यसन आदींचा समावेश करता येईल. कधी-कधी छोट्या व मोठ्या आजारांमुळेही माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. हल्ली डिप्रेशनमध्ये जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे नोकरी आहे.

लक्षणे...

डिप्रेशनमध्ये जाण्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. यामध्ये उदास वाटणे, झोप न येणे, जेवण कमी जाणे, तेच तेज विचार येणे, आत्महत्याचे विचार येणे, डोके जड राहणे, छोट्या- छोट्या गोष्टीच्या कारणांवरून चिडचिड होणे, विसरभोळेपणा येणे, जगावेसे न वाटणे, कामात मन लागणे आदी कारणांचा समावेश आहे.

उपाय ...

पूर्ण झोप घेतल्यास कोणताही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात नाही. दिलेल्या कामापेक्षा जास्त काम लागत असेल तर काही दिवसांकरिता त्याने सुटी घेणे हे त्याच्यासाठी फायद्याचेच आहे. जेवणात चांगला आहार ठेवत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे हे अशा डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीसाठी लाभदायकच असे आहे. योगाबरोबर सकाळच्यावेळी फिरायला गेल्यास हेही उत्तमच आहे.

डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना डिप्रेशन आले असले तरी अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधी विकली गेली नाहीत. विशेष म्हणजे कोरोना बरा होण्यासाठी आयुर्वेदिक औषधी मात्र अनेक जण घेऊन जातात. आयुर्वेदिक औषधाला मागणीही आहे. बाकी इतर आजारांची औषधीही रुग्ण घेऊन जात आहेत.

- मनोज आखरे, औषधी व्यवसायिक, हिंगोली