शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कोरोना लसीकरणांचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:24 IST

काेविड-१९ लसीकरणांतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

काेविड-१९ लसीकरणांतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, शासनाकडून कधीही कोरोनाची लस प्राप्त होऊ शकते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने लसीकरणाबाबतचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे. लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार प्राधान्याने आरोग्यसंबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत कोरोना लसीकरण महत्त्वाचा विषय असल्याने आरोग्य यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याची अंदाजे १४ लाख ५० हजार लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य विभागाकडे आहे, तसेच कोरोना लस साठवणुकीबरोबरच लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन करून यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे.

जिल्हास्तरावरून आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. कोरोना लस घेणाऱ्यांची निवड करून त्यांचे ‘कोविन ॲप’मध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करण्याचे कामदेखील वेळेत पूर्ण करावे. लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींना मेसेजद्वारे वेळ कळविण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये, तसेच लसीकरण झालेली व्यक्ती दुसऱ्याच्या संपर्कात येऊ नये, यासाठी योग्य नियोजन करावे. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा करावा. लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी निरीक्षण कक्षात योग्य नियोजन करावे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने लसीकरणाचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी २ लसीकरण केंद्रे अशी यामध्ये ४८ लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक सत्रात १०० जण असे एकूण ४ हजार ८०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे, तर शहरी भागात हिंगोली ४, वसमत ४, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव प्रत्येकी २, अशा एकूण १४ केंद्रांवर १ हजार ४०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने आज जिल्ह्यात ३ ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबतची यशस्वी रंगीत तालीम घेण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी दिली. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात परदेशातून, तसेच बाहेरील शहरातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यावेळी दिले.