शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र ...

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र आता मोबाईल, टीव्ही पाहण्याचा छंद, कोरोना काळातील विविध चिंतांनी अनेकांची झोपच उडविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने कहर केला. त्याचा प्रत्येक बाबीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. रोजगार, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण झाले. रिकामेपणी अनेकांना मोबाईल अथवा टीव्ही पाहत बसून जागरणाची सवय जडली, तर काहींना या चिंतांनी ग्रासल्याने झाेप येत नाही. अशांपैकी अनेक जण डॉक्टरांकडे हजेरी लावून मला झोपच येत नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यातच अंगमेहनतीची कामे कमी झाल्यानेही अनेकांना झोपेच्या त्रासाचा सामना करावा लागतो, तर दिनचर्या बदलल्याचा काहींना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

सततच्या जागरणाने रक्तदाबाचा त्रास होतो.

हृदयविकाराचा त्रासही जाणवण्याची भीती

मधुमेहाचा आजारही जडू शकतो.

इतरही शारीरिक व्याधींचा धोका

वयोमानानुसार झोपेचे तास ठरतात. त्यातुलनेत सतत अनेक दिवस झोप न लागल्यास विविध व्याधी जडू शकतात. वेळेवर झोपणे व उठणे ही चांगली सवय आहे.

-डॉ. यशवंत पवार

झोप का उडते

जास्त ताणतणावात दिवस गेल्यास अथवा चिंता वाढल्यास झोप लागत नाही. शिवाय मोबाईल अथवा टीव्हीची सवय लागली तरीही असे घडते.

जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत, अशांनाही लवकर झोप न लागल्याच्या समस्या अनेकदा जाणवतात.

गंभीर आजार असल्यास किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणींमुळेही निद्रानाशाची चिंता भेडसावू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेकजण झोप येत नसल्याने त्यावरील योग्य उपाय शोधण्याऐवजी थेट झोपेच्या गोळीचा आग्रह धरतात. मात्र, ती एक घातक सवय ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेणे टाळणेच हिताचे राहील.

नेमकी किती झोप हवी

नवजात बाळ १२ ते १४ तास

एक ते पाच वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२२ ते ४० वर्षे ८ ते ९ तास

४१ ते ६० ८ तास

६१ पेक्षा जास्त १० तासांपर्यंत

चांगली झोप यावी म्हणून

सकाळी लवकर उठावे

व्यायाम व शारीरिक कष्ट करावे.

आहार व्यवस्थित व वेळेवर घ्यावा.

मानसिक त्रागा करू नये.

योग्य व प्रामाणिक काम करून व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, आदी केल्यास झोपेबाबतची कोणतीच तक्रार राहणार नाही.

- डॉ. गोपाल कदम