शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र ...

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र आता मोबाईल, टीव्ही पाहण्याचा छंद, कोरोना काळातील विविध चिंतांनी अनेकांची झोपच उडविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने कहर केला. त्याचा प्रत्येक बाबीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. रोजगार, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण झाले. रिकामेपणी अनेकांना मोबाईल अथवा टीव्ही पाहत बसून जागरणाची सवय जडली, तर काहींना या चिंतांनी ग्रासल्याने झाेप येत नाही. अशांपैकी अनेक जण डॉक्टरांकडे हजेरी लावून मला झोपच येत नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यातच अंगमेहनतीची कामे कमी झाल्यानेही अनेकांना झोपेच्या त्रासाचा सामना करावा लागतो, तर दिनचर्या बदलल्याचा काहींना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

सततच्या जागरणाने रक्तदाबाचा त्रास होतो.

हृदयविकाराचा त्रासही जाणवण्याची भीती

मधुमेहाचा आजारही जडू शकतो.

इतरही शारीरिक व्याधींचा धोका

वयोमानानुसार झोपेचे तास ठरतात. त्यातुलनेत सतत अनेक दिवस झोप न लागल्यास विविध व्याधी जडू शकतात. वेळेवर झोपणे व उठणे ही चांगली सवय आहे.

-डॉ. यशवंत पवार

झोप का उडते

जास्त ताणतणावात दिवस गेल्यास अथवा चिंता वाढल्यास झोप लागत नाही. शिवाय मोबाईल अथवा टीव्हीची सवय लागली तरीही असे घडते.

जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत, अशांनाही लवकर झोप न लागल्याच्या समस्या अनेकदा जाणवतात.

गंभीर आजार असल्यास किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणींमुळेही निद्रानाशाची चिंता भेडसावू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेकजण झोप येत नसल्याने त्यावरील योग्य उपाय शोधण्याऐवजी थेट झोपेच्या गोळीचा आग्रह धरतात. मात्र, ती एक घातक सवय ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेणे टाळणेच हिताचे राहील.

नेमकी किती झोप हवी

नवजात बाळ १२ ते १४ तास

एक ते पाच वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२२ ते ४० वर्षे ८ ते ९ तास

४१ ते ६० ८ तास

६१ पेक्षा जास्त १० तासांपर्यंत

चांगली झोप यावी म्हणून

सकाळी लवकर उठावे

व्यायाम व शारीरिक कष्ट करावे.

आहार व्यवस्थित व वेळेवर घ्यावा.

मानसिक त्रागा करू नये.

योग्य व प्रामाणिक काम करून व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, आदी केल्यास झोपेबाबतची कोणतीच तक्रार राहणार नाही.

- डॉ. गोपाल कदम