शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र ...

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र आता मोबाईल, टीव्ही पाहण्याचा छंद, कोरोना काळातील विविध चिंतांनी अनेकांची झोपच उडविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने कहर केला. त्याचा प्रत्येक बाबीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. रोजगार, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण झाले. रिकामेपणी अनेकांना मोबाईल अथवा टीव्ही पाहत बसून जागरणाची सवय जडली, तर काहींना या चिंतांनी ग्रासल्याने झाेप येत नाही. अशांपैकी अनेक जण डॉक्टरांकडे हजेरी लावून मला झोपच येत नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यातच अंगमेहनतीची कामे कमी झाल्यानेही अनेकांना झोपेच्या त्रासाचा सामना करावा लागतो, तर दिनचर्या बदलल्याचा काहींना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

सततच्या जागरणाने रक्तदाबाचा त्रास होतो.

हृदयविकाराचा त्रासही जाणवण्याची भीती

मधुमेहाचा आजारही जडू शकतो.

इतरही शारीरिक व्याधींचा धोका

वयोमानानुसार झोपेचे तास ठरतात. त्यातुलनेत सतत अनेक दिवस झोप न लागल्यास विविध व्याधी जडू शकतात. वेळेवर झोपणे व उठणे ही चांगली सवय आहे.

-डॉ. यशवंत पवार

झोप का उडते

जास्त ताणतणावात दिवस गेल्यास अथवा चिंता वाढल्यास झोप लागत नाही. शिवाय मोबाईल अथवा टीव्हीची सवय लागली तरीही असे घडते.

जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत, अशांनाही लवकर झोप न लागल्याच्या समस्या अनेकदा जाणवतात.

गंभीर आजार असल्यास किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणींमुळेही निद्रानाशाची चिंता भेडसावू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेकजण झोप येत नसल्याने त्यावरील योग्य उपाय शोधण्याऐवजी थेट झोपेच्या गोळीचा आग्रह धरतात. मात्र, ती एक घातक सवय ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेणे टाळणेच हिताचे राहील.

नेमकी किती झोप हवी

नवजात बाळ १२ ते १४ तास

एक ते पाच वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२२ ते ४० वर्षे ८ ते ९ तास

४१ ते ६० ८ तास

६१ पेक्षा जास्त १० तासांपर्यंत

चांगली झोप यावी म्हणून

सकाळी लवकर उठावे

व्यायाम व शारीरिक कष्ट करावे.

आहार व्यवस्थित व वेळेवर घ्यावा.

मानसिक त्रागा करू नये.

योग्य व प्रामाणिक काम करून व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, आदी केल्यास झोपेबाबतची कोणतीच तक्रार राहणार नाही.

- डॉ. गोपाल कदम