शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना परतू लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

राज्यभरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, तसेच शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांचे देशभरात विविध भागांत स्थलांतर झाले होते. मात्र, ...

राज्यभरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, तसेच शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थ्यांचे देशभरात विविध भागांत स्थलांतर झाले होते. मात्र, कोरोना संसर्ग आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करावे लागले होते. लॉकडाऊन जाहीर होताच स्थलांतर झालेले कामगार, विद्यार्थी, नोकरदार गावाकडे परतले होते. गावाकडे आल्यानंतर अनेकांनी नवीन व्यवसाय थाटले, तर काही जणांनी पुन्हा मोठ्या शहरात जाण्याचे नियोजन केले होते. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने व्यवहार पुन्हा सुरळीत होत असून, परत स्थलांतर होताना दिसत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, अंदमान, निकोबार आदी भागांत कामगार परतले आहेत. विद्यार्थीही शिक्षणासाठी परत जात असल्याचे दिसत आहे.

५१९ जणांनी काढला पासपोर्ट

परदेशात नोकरी, शिक्षणानिमित्त जाण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ जणांनी पासपोर्ट काढला आहे. कोरोनापूर्वी बहुतांश जण परदेशात होते. त्यापैकी काहींनी परदेशातच थांबणे पसंत केले होते, तर काही मायदेशी परतले होते. आता कोरोना कमी झाल्याने पुन्हा परदेशात जाण्यासाठी तयारी चालवली आहे.

परदेशात असलेले हिंगोलीकर आपल्या कुटुंबीयांशी फोन, व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत खुशाली कळवत आहेत.

कोरोनाकाळात परदेश, परराज्य, परजिल्ह्यातून आलेले नागरिक

हिंगोली- १०,५१५

वसमत- ८,७७९

कळमनुरी- १२,३८५

सेनगाव- ११,१५२

औंढा- ७,११९

एकूण- ४९,९६०

मुले परदेशात, चिंता भारतात

१) माझा मुलगा नोकरीनिमित्त दुबई येथे आहे. अनेक देशांत कोरोना संसर्ग असल्याने काळजी वाटत होती. मात्र, वर्क फ्रॉम होम काम असल्याचे समजल्याने काळजी मिटली. सतत व्हाॅटस्‌ॲप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात असते. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे चिंता मिटली आहे.

-मनीषा गजानन मिस्किन, हिंगोली

२) माझा मुलगा बालासाहेब निर्मले हा शिंगणापूर येथील अँग्लो इस्टर्न कंपनीत मरीन चीफ इंजिनिअर आहे. कोरोनाकाळात त्याच्या आरोग्याची काळजी वाटत होती. त्यामुळे व्हॉटस्‌ॲप कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होते. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे आता काळजी मिटली आहे.

-विजयमाला कुंडलिकराव निर्मले, हिंगोली