शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला तीन हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

हिंगोली : गतवर्षी कोरोना संसर्ग आजारामुळे अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना ...

हिंगोली : गतवर्षी कोरोना संसर्ग आजारामुळे अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. याहीवर्षी कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना नियमांचे पालन करीत जवळपास तीन हजार लग्नसोहळे उरकण्यात आले. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला आहे. गतवर्षी ऐन लग्नसराईत कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे लग्नतारखा जाहीर झाल्यानंतरही अनेकांना लग्नसोहळे पुढे ढकलावे लागले होते. त्यानंतर मध्यंतरी कोरोना आजाराचे रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे पुन्हा लग्नसोहळे आयोजित करण्यात येत होते. मंगलकार्यालये बुकिंग करून ठेवले होतेे. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. केवळ ५० नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली. ५० जणांना परवानगी असली तरी अनेक ठिकाणी शेकडो नातेवाइकांनी लग्न सोहळ्यास उपस्थिती लावली. ग्रामीण भागात तर धुमधडाक्यात लग्न सोहळे आयोजित करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास तीन हजार लग्नसोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची नजर चुकवून लग्नसोहळे आयोजित करण्यात आले. याच वेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला.

१९ जोडप्यांनी केली विवाहाची नोंदणी

हिंगोली येथील सह. दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय वर्ग -२ यांच्याकडे वर्षभरात १९ जोडप्यांनी लग्न झाल्याची नोंद केली आहे. हा आकडा कार्यालयापुरता असला तरी प्रत्यक्षात लग्न सोहळ्यांचा आकडा हजारांमध्ये असल्याचे जाणकार सांगत आहेत. विवाह नोंदणी करण्यास ग्रामीण भागात अद्याप उदासीनता दिसून येत आहे.

तीन महिन्यांत ३१ विवाह मुहूर्त

जिल्ह्यात जवळपास तीन हजार विवाह झाले असले तरी अजूनही एप्रिल ते जून या महिन्यात ३१ विवाह मुहूर्त आहेत. यात एप्रिल महिन्यात २२, २४, २५,२६,२८,२९, ३० (७ मुहूर्त) मे महिना : १,२,३,४,५,८,१३,१५,२०,२१,२२,२४, २६, २८,३०, ३१ (१६ मुहूर्त) जून महिना : ४,६,१३,१६,२०,२६,२७,२८ (८ मुहूर्त) असे एकूण ३१ मुहूर्त आहेत.

एप्रिल महिना कठीण

जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी लग्न सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता चांगलीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कोरोना आजाराचा संसर्ग नव्हता तेव्हा मंगलकार्यालयात लग्न सराईत ८० ते ९० लग्न सोहळे होत होते. मात्र, कोरोना आजारामुळे यावर्षी केवळ १ ते २ च लग्नसोहळे मंगलकार्यालयात झाले आहेत. यात मंगलकार्यालय मालकांचे मोठे नुकसान होत आहे.

- निश्चल यंबल, अध्यक्ष, महावीर भवन

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगलकार्यालय बंदच ठेवण्यात आले आहे. आलेल्या बुग रद्द कराव्या लागल्या. कोरोना नव्हता तेव्हा दोन महिन्यांपासून अगोदरच तारखा बुकिंग करून ठेवल्या जात होत्या.

- गोकुळ तोष्णीवाल, कळमनुरी