शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

कोरोना महामारीमुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया या बंद करण्यात आलेल्या ...

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया या बंद करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाआधी जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याकाठी ६० ते ७० मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडत होत्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना औषधोपचार केले जायचे. गरज पडल्यास दाखल करुन बेडचीही व्यवस्था केली जायची, असेही रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

डिसेंबर २०२०, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण १८७ शस्त्रक्रिया पार पडल्या. यात ‘आयओएल’ १८३ आणि ‘पीएलएआयएन’ या ४ अशा शस्त्रक्रियेचा समावेश आहे. सदरील शस्त्रक्रिया डाॅ. चंद्रशेखर अपनगिरे, डाॅ. सोनाली कदम, डाॅ. सुनील गुडेवार, डाॅ.फेदडकर यांनी पार पाडल्या. सध्यातरी शस्त्रक्रिया विभाग बंद पडल्याने अनेक समस्या उद्‌भवत आहेत.

अंधार कधी दूर होणार?

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे सळो की पळो करुन सोडले आहे, डोळे दुखतात, खाजवतात, डोळ्यांत पाणी येते, डोळ्यांच्या कडा दुखतात? असे एक ना अनेक प्रश्न समोर आहेत. शस्त्रक्रिया कराव्या म्हटले तर शस्त्रक्रिया विभाग हा कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आला आहे. कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतरच सुरु होईल, असे जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले. फारच त्रास झाला तर खासगी डाॅक्टरांकडे जावे लागते. त्यामुळे आर्थिक बाबी समोर येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांचा शस्त्रक्रिया विभाग सुरु करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही रुग्णांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. डिसेंबर २०२० आणि त्यानंतर २०२१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १८७ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. कोरोना महामारीचा उद्रेक वाढल्यामुळे या आजाराचा संसर्ग डोळ्यांच्या रुग्णांना होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाने काळजी घेत पुढील आदेश येईपर्यंत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. किरकोळ आजार असेल तर औषधोपचार रुग्णांना करत आहोत.

- डाॅ. चंद्रशेखर अपनिगरे, नेत्ररुग्ण विभागप्रमुख