शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोना कमी; परंतु इतर आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST

मार्च महिन्यांपासून नोव्हेंबर महिन्यांपर्यंत कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत होते. आज कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. आपण ...

मार्च महिन्यांपासून नोव्हेंबर महिन्यांपर्यंत कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत होते. आज कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. आपण दवाखान्यात दाखल झालो तर कोरोनाचा आजार आपल्याला जडेल या भीतीपोटी रुग्ण दवाखान्यात येत नव्हते. आठ महिने केवळ कोरोनाचेच रुग्णच दवाखान्यात होते. मागील दोन-अडीच महिन्यांपासून कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे वीस-बावीस दिवसांपासून वातावरणात बदलही झाला आहे. थंडीसह गार वारे व ढगाळ वातावरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये त्वचारोग, दमा, श्वसनाचे आजार, पोटदुखी, जुलाब, ॲलर्जी, ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे.

कोरोना आजार कमी झाला असून, रोज तीन-चार रुग्ण काळजी न घेतल्यामुळे वाढत आहेत. कोरोना आजार होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा अशा सूचनाही दिल्या जात आहेत. एकंदर इतर रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

२०१८-१९ या वर्षात साडेचार हजार रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवा घेेतली. ६० हजार रुग्णांनी अंतररुग्ण म्हणून सेवा घेतली. २०१९-२० मध्ये ४ लाख ८२ हजार २७२ रुग्णांची बाह्यरुग्ण सेवा घेतली आणि ६५ हजार ७६१ रुग्णांनी अंतररुग्ण म्हणून सेवा घेतली. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात १ लाख १३ हजार ४७८ रुग्णांनी ओपीडी सेवा घेतली. २६ हजार ८०७ अंतररुग्ण म्हणून दाखल झाले. कोरोना काळात बाह्यरुग्ण व अंतर रुग्णांचे प्रमाण कमी होते. डिसेंबर महिन्यात मात्र ही संख्या वाढलेली पहायला मिळत आहे.

तुलनात्मकदृष्ट्या कोरोना काळात इतर रुग्ण दवाखान्यात येण्यास तयार होत नव्हते. आता इतर आजाराचे प्रमाण वाढले आहेत. शस्त्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालय हिंगोली, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, ग्रामीण रुग्णालय सेनगाव, औंढा, बाळापूर आणि स्त्री रुग्णालय वसमत या पाच संस्थेतील रुग्णांनी अडीच वर्षात सेवा घेतल्या. कोणतीही भीती न बाळगता इतर आजाराच्या रुग्णांनी दवाखान्यात संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.