शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत ...

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोना आजार असूनही तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेेवेत त्रुटी देणाऱ्या विक्रेता, पुरवठादाराविरुद्ध जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हा ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने व लवकर न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा जिल्हा ग्राहक न्याय मंचावर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये २३४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात पुन्हा भर पडत २०२० मध्ये ६४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोना आजारामुळे लॉकडाऊन असले तरीही ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी घराबाहेर पडत जिल्हा ग्राहक न्याय मंचाची पायरी चढली. दरम्यान, २०१९ मध्ये ४३, तर २०२० मध्ये ३० तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा ग्राहक न्याय मंचास यश आले आहे.

तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या

येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे सर्वच स्तरातील ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी धाव घेतली आहे. वैयक्तिक तक्रारींसह काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे

तक्रारी नेमक्या काय?

१) येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ग्राहकांनी विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पीक विमा, बियाणे संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

२) बँक, पतपेढी, एलआयसी, इन्शुरन्स या संदर्भातीलही तक्रारी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्याय मंचात लवकर न्याय मिळत असल्यानेच तक्रारदार ग्राहकांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया

ग्राहक आपल्या न्याय हक्कांबाबत जागृत झाले आहेत. ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असून, निकाल लवकर लागतो. त्यामुळे ग्राहकांना ग्राहक मंच जवळचा वाटत आहे. २०२० मध्येही न्याय हक्कांसाठी ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यात विश्वास वाढावा, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

- जे. ए. सावळेश्वरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच