शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत ...

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोना आजार असूनही तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेेवेत त्रुटी देणाऱ्या विक्रेता, पुरवठादाराविरुद्ध जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हा ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने व लवकर न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा जिल्हा ग्राहक न्याय मंचावर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये २३४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात पुन्हा भर पडत २०२० मध्ये ६४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोना आजारामुळे लॉकडाऊन असले तरीही ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी घराबाहेर पडत जिल्हा ग्राहक न्याय मंचाची पायरी चढली. दरम्यान, २०१९ मध्ये ४३, तर २०२० मध्ये ३० तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा ग्राहक न्याय मंचास यश आले आहे.

तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या

येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे सर्वच स्तरातील ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी धाव घेतली आहे. वैयक्तिक तक्रारींसह काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे

तक्रारी नेमक्या काय?

१) येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ग्राहकांनी विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पीक विमा, बियाणे संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

२) बँक, पतपेढी, एलआयसी, इन्शुरन्स या संदर्भातीलही तक्रारी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्याय मंचात लवकर न्याय मिळत असल्यानेच तक्रारदार ग्राहकांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया

ग्राहक आपल्या न्याय हक्कांबाबत जागृत झाले आहेत. ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असून, निकाल लवकर लागतो. त्यामुळे ग्राहकांना ग्राहक मंच जवळचा वाटत आहे. २०२० मध्येही न्याय हक्कांसाठी ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यात विश्वास वाढावा, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

- जे. ए. सावळेश्वरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच