शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत ...

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोना आजार असूनही तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेेवेत त्रुटी देणाऱ्या विक्रेता, पुरवठादाराविरुद्ध जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हा ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने व लवकर न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा जिल्हा ग्राहक न्याय मंचावर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये २३४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात पुन्हा भर पडत २०२० मध्ये ६४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोना आजारामुळे लॉकडाऊन असले तरीही ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी घराबाहेर पडत जिल्हा ग्राहक न्याय मंचाची पायरी चढली. दरम्यान, २०१९ मध्ये ४३, तर २०२० मध्ये ३० तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा ग्राहक न्याय मंचास यश आले आहे.

तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या

येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे सर्वच स्तरातील ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी धाव घेतली आहे. वैयक्तिक तक्रारींसह काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे

तक्रारी नेमक्या काय?

१) येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ग्राहकांनी विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पीक विमा, बियाणे संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

२) बँक, पतपेढी, एलआयसी, इन्शुरन्स या संदर्भातीलही तक्रारी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्याय मंचात लवकर न्याय मिळत असल्यानेच तक्रारदार ग्राहकांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया

ग्राहक आपल्या न्याय हक्कांबाबत जागृत झाले आहेत. ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असून, निकाल लवकर लागतो. त्यामुळे ग्राहकांना ग्राहक मंच जवळचा वाटत आहे. २०२० मध्येही न्याय हक्कांसाठी ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यात विश्वास वाढावा, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

- जे. ए. सावळेश्वरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच