शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

४ जानेवारी रोजी ४५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ७६१ सदस्यांच्या जागेसाठी १६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात ...

४ जानेवारी रोजी ४५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ७६१ सदस्यांच्या जागेसाठी १६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे होणार आहे. १०९ ग्रामपंचायतींमध्ये ७३ हजार ४२१ पुरुष व ६६ हजार ७८८ महिला मतदार आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी अथवा तिरंगी लढती पाहावयाला मिळणार आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

तालुक्‍यातील १९ मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रांवर पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात येणार आहे. पोलिसांची करडी नजर या मतदान केंद्रांवर राहणार आहे. १०९ ग्रामपंचायतींसाठी ३५४ मतदान केंद्रे असून कर्मचाऱ्यांना २ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत पहिले प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला १९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या कर्मचाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. पाडापाडीचे राजकीय डाव आखण्यात येत आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जागोजागी कार्यकर्ते जमा होत आहेत. कार्यकर्ते सांभाळताना गावपुढाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. पैशांची उधळपट्टी आतापासून सुरू आहे. उमेदवार मतदारयाद्यांकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांची हात जोडून मतांसाठी विनवणी करीत आहेत. मतदान मागण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना मतदारही हो म्हणून वेळ मारून नेत आहेत. तालुक्‍यातील १६ ग्रामपंचायतींतील ११४ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त थकबाकी वसूल झालेली आहे. राजकीय कुस्त्यांचे फड गावोगावी चांगलेच रंगलेले दिसत आहेत.