शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांचाही होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला ...

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद बघता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्याने शाळांत किलबिलाट सुरू झाला आहे. मात्र, अद्याप पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले नाहीत. शहरातील शाळांतून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात मोबाइल रेंजचा प्रश्न कायम आहे. अनेक पालकांकडे तर ॲण्ड्राइड मोबाइल नसल्याने मोठी पंचाईत होत आहे. दिवसभर अभ्यास नसल्याने मुलेही घरात राहून कंटाळली आहेत. शाळा सुरू झाल्यास मुले शाळेत जाण्यास तयार असून पालकही मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

मला यावर्षी पहिल्यांदाच पहिलीच्या वर्गात गेले आहे. मात्र, शाळाच बंद असल्याने घरीच आहे. घरी राहून आता कंटाळा येत आहे. शाळेसाठी नवीन शूज, स्कूल बॅग, घरातच असून घालताही येत नाही. मला शाळेत जायचे आहे.

-श्रावणी स्वामी, इयत्ता पहिली

यावर्षी आमची शाळा सुरू झालीच नाही. घरीच अभ्यास करून कंटाळा येत असून आई व पप्पा बाहेर फिरू देत नाहीत. शाळेची खूप आठवण येत असून माझे नवीन दप्तर व शाळेचा गणवेश तसाच ठेवून दिला आहे. मला शाळेत जावे वाटत आहे.

-अश्विनी खराटे, इयत्ता दुसरी

घरी राहून खूप कंटाळा आला असून शाळेत जावे वाटत आहे. परंतु, आमचे शिक्षक फक्त पाचवीपासून पुढच्यांनाच शाळेत येऊ देत आहेत. आमचे वर्ग अजूनही बंदच आहेत. यावर्षी ध्वजारोहणलाही जाता आले नाही. आम्हाला लवकर शाळेत जायचे आहे

- अमृता मुलगीर, इयत्ता तिसरी

घरात सारखं-सारखं राहून कंटाळा आला आहे. सर्वच मुले शाळेत जात आहेत. आम्ही मात्र घरीच राहत असून आम्हालाही शाळेत जायचं आहे. वर्ग लवकर सुरू करावेत.

-तन्वी गव्हाणे, इयत्ता पहिली

पालकांना चिंता...

मागील जवळपास एक वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी, विद्यार्थी घरातच असून अभ्यासाची सवय तुटली आहे. माझी मुलगी इयत्ता चौथ्या वर्गात शिकत आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच असल्याने पालकांसह विद्यार्थीही सुट्ट्यांना कंटाळले आहेत. वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- अरविंद खराटे, पालक

इतर वर्गांची शाळा सुरू झाली तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी अद्याप घरीच आहेत. शाळा नसल्यामुळे अभ्यास होत नसून वर्ष वाया जात आहे. इतर वर्गाप्रमाणे प्राथमिकचे वर्गही सुरू करावेत, अशी अपेक्षा आहे.

-ज्ञानेश्वर गोफणे, पालक

यावर्षी शाळाच सुरू न झाल्याने वर्षभरापासून विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रम सद्य:स्थितीत सुरू नसल्याने व ग्रामीण भागात आम्हा पालकांना मुलांकडे सतत लक्ष देता येत नसल्याने मुलांमध्ये उनाडक्या वाढत आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.

-सिद्धार्थ मोरे, पालक

कोरोनामुळे काही नियम व अटी घालून पाचवी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करावेत. मुले घरात राहून कंटाळले आहेत.

-सचिन बेलोकर, पालक जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा

१३१५

विद्यार्थीसंख्या

९००२३