शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांचाही होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला ...

कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्याने सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद बघता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्याने शाळांत किलबिलाट सुरू झाला आहे. मात्र, अद्याप पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले नाहीत. शहरातील शाळांतून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात मोबाइल रेंजचा प्रश्न कायम आहे. अनेक पालकांकडे तर ॲण्ड्राइड मोबाइल नसल्याने मोठी पंचाईत होत आहे. दिवसभर अभ्यास नसल्याने मुलेही घरात राहून कंटाळली आहेत. शाळा सुरू झाल्यास मुले शाळेत जाण्यास तयार असून पालकही मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

मला यावर्षी पहिल्यांदाच पहिलीच्या वर्गात गेले आहे. मात्र, शाळाच बंद असल्याने घरीच आहे. घरी राहून आता कंटाळा येत आहे. शाळेसाठी नवीन शूज, स्कूल बॅग, घरातच असून घालताही येत नाही. मला शाळेत जायचे आहे.

-श्रावणी स्वामी, इयत्ता पहिली

यावर्षी आमची शाळा सुरू झालीच नाही. घरीच अभ्यास करून कंटाळा येत असून आई व पप्पा बाहेर फिरू देत नाहीत. शाळेची खूप आठवण येत असून माझे नवीन दप्तर व शाळेचा गणवेश तसाच ठेवून दिला आहे. मला शाळेत जावे वाटत आहे.

-अश्विनी खराटे, इयत्ता दुसरी

घरी राहून खूप कंटाळा आला असून शाळेत जावे वाटत आहे. परंतु, आमचे शिक्षक फक्त पाचवीपासून पुढच्यांनाच शाळेत येऊ देत आहेत. आमचे वर्ग अजूनही बंदच आहेत. यावर्षी ध्वजारोहणलाही जाता आले नाही. आम्हाला लवकर शाळेत जायचे आहे

- अमृता मुलगीर, इयत्ता तिसरी

घरात सारखं-सारखं राहून कंटाळा आला आहे. सर्वच मुले शाळेत जात आहेत. आम्ही मात्र घरीच राहत असून आम्हालाही शाळेत जायचं आहे. वर्ग लवकर सुरू करावेत.

-तन्वी गव्हाणे, इयत्ता पहिली

पालकांना चिंता...

मागील जवळपास एक वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी, विद्यार्थी घरातच असून अभ्यासाची सवय तुटली आहे. माझी मुलगी इयत्ता चौथ्या वर्गात शिकत आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच असल्याने पालकांसह विद्यार्थीही सुट्ट्यांना कंटाळले आहेत. वर्ग सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- अरविंद खराटे, पालक

इतर वर्गांची शाळा सुरू झाली तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी अद्याप घरीच आहेत. शाळा नसल्यामुळे अभ्यास होत नसून वर्ष वाया जात आहे. इतर वर्गाप्रमाणे प्राथमिकचे वर्गही सुरू करावेत, अशी अपेक्षा आहे.

-ज्ञानेश्वर गोफणे, पालक

यावर्षी शाळाच सुरू न झाल्याने वर्षभरापासून विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रम सद्य:स्थितीत सुरू नसल्याने व ग्रामीण भागात आम्हा पालकांना मुलांकडे सतत लक्ष देता येत नसल्याने मुलांमध्ये उनाडक्या वाढत आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.

-सिद्धार्थ मोरे, पालक

कोरोनामुळे काही नियम व अटी घालून पाचवी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करावेत. मुले घरात राहून कंटाळले आहेत.

-सचिन बेलोकर, पालक जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या शाळा

१३१५

विद्यार्थीसंख्या

९००२३