शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हिंगोली वगळता जिल्ह्यांत पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. ...

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी

औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील संपूर्ण वॉर्डांत धूरफवारणी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, अद्यापही नगरपंचायतने लक्ष दिलेले नाही. वरिष्ठांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कनेरगावात कमी दाबाने वीजपुरवठा

कनेरगाव नाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे गत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जास्त दाबाने वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.

औंढा बसस्थानकावर पाण्याचा अपव्यय

औंढा नागनाथ : मागील वीस-पंचवीस दिवसांपासून बसस्थानकासमोर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याची काळजी घेणे गरजेचे असताना कोणीच याकडे लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे. वरिष्ठांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी होत आहे.

नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या बाबीची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव

हिंगोली : उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास औषधाची फवारणी करावी. हेक्टरी २ ते ३ ट्रायकोकार्ड दहा दिवसांच्या अंतराने ४ ते ६ वेळा वापरावे. तसेच क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

फळांवर रसशोष करणारी किडे

हिंगोली: आंबे, डाळिंबबागेत रसशोष करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीचा नायनाट करण्यासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोरप्रीड १७.८ टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हात फवारणी करणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘भाजीपाला पिकांची काढणी लवकर करावी’

हिंगोली : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. भाजीपाल्यांवर अळीचा प्रादुर्भाव असल्यास उन्हात औषधाची फवारणी करू नये. काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याची काढणी ही सकाळी करून घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी पाणी द्यावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.