शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

हिंगोली वगळता जिल्ह्यांत पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. ...

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी

औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील संपूर्ण वॉर्डांत धूरफवारणी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, अद्यापही नगरपंचायतने लक्ष दिलेले नाही. वरिष्ठांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कनेरगावात कमी दाबाने वीजपुरवठा

कनेरगाव नाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे गत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जास्त दाबाने वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.

औंढा बसस्थानकावर पाण्याचा अपव्यय

औंढा नागनाथ : मागील वीस-पंचवीस दिवसांपासून बसस्थानकासमोर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याची काळजी घेणे गरजेचे असताना कोणीच याकडे लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे. वरिष्ठांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी होत आहे.

नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या बाबीची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव

हिंगोली : उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास औषधाची फवारणी करावी. हेक्टरी २ ते ३ ट्रायकोकार्ड दहा दिवसांच्या अंतराने ४ ते ६ वेळा वापरावे. तसेच क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

फळांवर रसशोष करणारी किडे

हिंगोली: आंबे, डाळिंबबागेत रसशोष करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीचा नायनाट करण्यासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोरप्रीड १७.८ टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हात फवारणी करणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘भाजीपाला पिकांची काढणी लवकर करावी’

हिंगोली : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. भाजीपाल्यांवर अळीचा प्रादुर्भाव असल्यास उन्हात औषधाची फवारणी करू नये. काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याची काढणी ही सकाळी करून घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी पाणी द्यावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.