शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

हिंगोलीसाठी योजना आणा, मंजुरी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:33 IST

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला ...

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला मदत करण्याची मनोमन इच्छा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सामाजिक अधिकारता कार्यक्रमात ऑनलाईन भाषणात केले.

या कार्यक्रमास खा. हेमंत पाटील, आ .तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांच्यासह एलिम्कोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, दिव्यांगांना योग्य ती मदत मिळावी, ही आमची कायम भूमिका राहिली आहे. एकवेळ सर्वसाधारण माणूस तर मनाने दिव्यांग असू शकतो; मात्र दिव्यांग बांधव मनाने खंबीर असतात. त्यांना योग्यप्रकारचे साहित्य व वातावरण मिळाले, तर ते स्वत:ला सिद्ध करतात, असा माझा अनुभव आहे. हिंगोलीत ३ हजार लाभार्थ्यांना विविधप्रकारचे साहित्य मिळत आहे. खा. पाटील यांनी यासाठी केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.

खा. पाटील म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी केलेल्या मदतीमुळे आज २.७५ कोटी रुपयांचे साहित्य हिंगोली लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यासाठी त्यांनी चाकोरी सोडून केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. पक्षीय भेद बाजूला सारून त्यांनी ही मदत केली. १५ हजार लोकांच्या तपासण्या करून त्यांना नंतर साहित्य देणे ही काही सोपी बाब नाही. मात्र एलिम्कोच्या अधिकाऱ्यांनी हे शक्य केले. खेड्यापाड्यातील ज्या दिव्यांगांना बाहेरही पडता येणे शक्य नाही, त्यांना या साहित्याची मोठी मदत होणार आहे. अंध, कर्णबधिर, हात, पायाने अधू अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक साहित्य दिले जाणार आहे. सायकल, बॅटरीवरील सायकल, कुबड्या, वॉकर, कर्णयंत्र, ब्रेल लिपी कीट, मोबाईल आदी साहित्याचा यात समावेश आहे.

यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने देशभरात केली जात असलेली ही मदत दिव्यांगांना सामर्थ्य देणारी आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यालाही आठवले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानायला पाहिजे. भविष्यातही अशाच मदतीची अपेक्षा आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात काही लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तर कोरोनाच्या काळात एकाच ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये, यासाठी उर्वरित लाभार्थ्यांना हे साहित्य पंचायत समित्यांमार्फत घरपोच दिले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत त्यांचे वाटप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन संजय बोहरा यांनी केले. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.