शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीसाठी योजना आणा, मंजुरी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:33 IST

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला ...

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला मदत करण्याची मनोमन इच्छा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सामाजिक अधिकारता कार्यक्रमात ऑनलाईन भाषणात केले.

या कार्यक्रमास खा. हेमंत पाटील, आ .तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांच्यासह एलिम्कोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, दिव्यांगांना योग्य ती मदत मिळावी, ही आमची कायम भूमिका राहिली आहे. एकवेळ सर्वसाधारण माणूस तर मनाने दिव्यांग असू शकतो; मात्र दिव्यांग बांधव मनाने खंबीर असतात. त्यांना योग्यप्रकारचे साहित्य व वातावरण मिळाले, तर ते स्वत:ला सिद्ध करतात, असा माझा अनुभव आहे. हिंगोलीत ३ हजार लाभार्थ्यांना विविधप्रकारचे साहित्य मिळत आहे. खा. पाटील यांनी यासाठी केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.

खा. पाटील म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी केलेल्या मदतीमुळे आज २.७५ कोटी रुपयांचे साहित्य हिंगोली लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यासाठी त्यांनी चाकोरी सोडून केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. पक्षीय भेद बाजूला सारून त्यांनी ही मदत केली. १५ हजार लोकांच्या तपासण्या करून त्यांना नंतर साहित्य देणे ही काही सोपी बाब नाही. मात्र एलिम्कोच्या अधिकाऱ्यांनी हे शक्य केले. खेड्यापाड्यातील ज्या दिव्यांगांना बाहेरही पडता येणे शक्य नाही, त्यांना या साहित्याची मोठी मदत होणार आहे. अंध, कर्णबधिर, हात, पायाने अधू अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक साहित्य दिले जाणार आहे. सायकल, बॅटरीवरील सायकल, कुबड्या, वॉकर, कर्णयंत्र, ब्रेल लिपी कीट, मोबाईल आदी साहित्याचा यात समावेश आहे.

यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने देशभरात केली जात असलेली ही मदत दिव्यांगांना सामर्थ्य देणारी आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यालाही आठवले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानायला पाहिजे. भविष्यातही अशाच मदतीची अपेक्षा आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात काही लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तर कोरोनाच्या काळात एकाच ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये, यासाठी उर्वरित लाभार्थ्यांना हे साहित्य पंचायत समित्यांमार्फत घरपोच दिले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत त्यांचे वाटप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन संजय बोहरा यांनी केले. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.