शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हयातीच्या दाखल्यासाठी लाभार्थ्यांना माराव्या लागतात तहसीलच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

हिंगोली: दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ...

हिंगोली: दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतले जाणारे हयात प्रमाणपत्र (दाखला) यावर्षी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे घेणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. १० एप्रिलपासून हयात प्रमाणपत्र स्वीकारले जाईल, असे तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी आधारकार्ड, एक फोटो आणि बँकेचे पासबूक अर्जासोबत जोडून सदरील अर्ज नगरसेवक, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहीने तहसीलला सादर करावा लागतो. परंतु, सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले नसल्यामुळे तहसील कार्यालयात ते स्वीकारले जात नाही. त्यामुळे संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

बहुतांशवेळा काही लाभार्थिंना सही आणि शिक्क्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत, असेही लाभार्थ्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र सादर केले की, तहसील कार्यालय संबंधित लाभार्थिंची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक, बडोदा बँक, युनियन बँक, भारतीय स्टेट बँकेत सादर करते. यानंतर लाभार्थ्यांना बँकेत पैसे मिळतात. काही लाभार्थी बँकेत जात आहेत. परंतु, यादीच आली नाही. यादी आल्यास आम्ही तुम्हाला पैसे देवू, असे म्हणून बँक अधिकारी नामानिराळे होत आहेत. एकंदर लाभार्थिंना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

हयात प्रमाणपत्र घेणार तरी कधी?

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाने हयात प्रमाणपत्र घेणे सध्या बंद केल्यामुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाने बाहेर फलक लावायला पाहिजे. परंतु, तसा कोणताही फलकही लावला नाही. कामधंदा सोडून हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काही लाभार्थी सकाळ, दुपार तहसीलला जात आहेत.

इंदिरा गांधी, श्रावणबाळ आणि संजय गांधी या योजनेतील पैसे देण्यासाठी लाभार्थिंची यादी आमच्याकडे येते. याप्रमाणे आम्ही पैसे वाटप करतो. अजून तरी पूर्ण यादी बँकेत आलेली नाही.

- दीपक सरनाईक, बँक अधिकारी