शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सावधान! १३ टक्के पाणी नमुने दूषित; पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; ...

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; मात्र आरोग्य विभाग अथवा जि.प.च्या पंचायत विभागाकडून सर्व गावांतील जलस्त्रोतांची तपासणीच केली जात नाही. ज्यांची तपासणी केली जाते. त्यावरच उपाय केले जातात. त्यालाही ग्रामपंचायती जुमानत नाहीत. जिल्ह्यात ७२४ गावांत ५१८५ स्त्रोत आहेत. यापैकी जलसुरक्षकांकडून ७५४ तर आरोग्य विभागाकडून ४९० नमुने तपासले गेले आहेत. सध्या इतर कारणे सांगून पाणी नमुने घेण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

४९० ग्रामीण पाणी नमुने तपासले

५६ पाणी नमुने आढळले दूषित

शहरी भागात २ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

९४ पाणी नमुने घेतले

२ पाणी नमुने दूषित

९२ पाणी नमुने चांगले

तालुकानिहाय आढावा

औंढा

एकूण नमुने ४९

दूषित १

वसमत

एकूण नमुने १०४

दूषित १३

हिंगोली

एकूण नमुने ६१

दूषित १८

कळमनुरी

एकूण नमुने १६६

दूषित २०

सेनगाव

एकूण नमुने ११०

दूषित १४

एका स्त्रोताची वर्षात दोनदा तपासणी अनिवार्य

प्रत्येक गावातील प्रत्येक जलस्त्रोताची वर्षातून दोनदा तपासणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यात कोणी सहसा दिरंगाई करीत नाही. तसा प्रकार आढळल्यास ग्रामसेवकांना तत्काळ सूचना दिल्या जातात, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे यांनी दिली.

ज्या स्त्रोताचे पाणी रासायनिक तपासणीत अयोग्य ठरते तो बंद केला जातो. तर जैविक तपासणीत अयोग्य ठरल्यास ब्लिचिंग पावडर, स्त्रोत परिसर स्वच्छता करून दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घेतली जाते.

पावसाळ्यात दूषित पाणी नमुने वाढतात. या काळात ग्रामसेवकांनी दक्ष राहून दूषित नमुने आढळलेल्या स्त्रोतांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती पावले उचलावीत अन्यथा कारवाईचा इशाराही पोहरे यांनी दिला.

कोरोनामुळे नमुन्यांवर परिणाम

विविध प्रकारची कारणे सांगून पाणी नमुने कमी असल्याच्या प्रकारावर पांघरुण घातले जात आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरणात गुंतली आहे. कोरोनामुळे इतरही कामे मागे लागल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे भूजल सर्वेक्षणच्या नमुन्यांचे प्रमाण मात्र चांगले आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत औंढ्यात ५२ पैकी १०, वसमतला ४९८ पैकी ५९, हिंगोलीत १७ पैकी ०, कळमनुरीत १०० पैकी १२ तर सेनगावात ८७ पैकी १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. हे प्रमाण १३ टक्के आहे.

या महिन्यात पुन्हा वाढीव काम करण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याचे जि.प.च्या सूत्रांनी सांगितले.

शहरी भागात कमी प्रमाण

शहरी भागात सहसा नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. बाहेरचे जलस्त्रोत कमी असतात. त्यामुळे शहरात दूषित नमुने आढळण्याचे प्रमाण कमी आहे.

शहरी भागात स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे हातपंपासारखे वापराचे स्त्रोत सहसा दूषित आढळत नाहीत.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे

पावसाळ्यात शहरी असो वा ग्रामीण भागातील उघडे जलस्त्रोत दूषित होण्याचा धोका जास्त असतो.

यामुळे जलजन्य आजारांचा धोकाही वाढतो. ब्लिचिंग पावडरचा वापर केला तर हा धोका टळतो.

अनेक ठिकाणी ब्लिचिंग टाकले की नाही, हेही कळत नाही. त्यामुळे पाणी उकळून व गाळून प्यायल्यास आजारी पडण्यापासून वाचता येते.

पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा.