शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! १३ टक्के पाणी नमुने दूषित; पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; ...

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये इतर पाणी मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती असते; मात्र आरोग्य विभाग अथवा जि.प.च्या पंचायत विभागाकडून सर्व गावांतील जलस्त्रोतांची तपासणीच केली जात नाही. ज्यांची तपासणी केली जाते. त्यावरच उपाय केले जातात. त्यालाही ग्रामपंचायती जुमानत नाहीत. जिल्ह्यात ७२४ गावांत ५१८५ स्त्रोत आहेत. यापैकी जलसुरक्षकांकडून ७५४ तर आरोग्य विभागाकडून ४९० नमुने तपासले गेले आहेत. सध्या इतर कारणे सांगून पाणी नमुने घेण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

४९० ग्रामीण पाणी नमुने तपासले

५६ पाणी नमुने आढळले दूषित

शहरी भागात २ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

९४ पाणी नमुने घेतले

२ पाणी नमुने दूषित

९२ पाणी नमुने चांगले

तालुकानिहाय आढावा

औंढा

एकूण नमुने ४९

दूषित १

वसमत

एकूण नमुने १०४

दूषित १३

हिंगोली

एकूण नमुने ६१

दूषित १८

कळमनुरी

एकूण नमुने १६६

दूषित २०

सेनगाव

एकूण नमुने ११०

दूषित १४

एका स्त्रोताची वर्षात दोनदा तपासणी अनिवार्य

प्रत्येक गावातील प्रत्येक जलस्त्रोताची वर्षातून दोनदा तपासणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यात कोणी सहसा दिरंगाई करीत नाही. तसा प्रकार आढळल्यास ग्रामसेवकांना तत्काळ सूचना दिल्या जातात, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे यांनी दिली.

ज्या स्त्रोताचे पाणी रासायनिक तपासणीत अयोग्य ठरते तो बंद केला जातो. तर जैविक तपासणीत अयोग्य ठरल्यास ब्लिचिंग पावडर, स्त्रोत परिसर स्वच्छता करून दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घेतली जाते.

पावसाळ्यात दूषित पाणी नमुने वाढतात. या काळात ग्रामसेवकांनी दक्ष राहून दूषित नमुने आढळलेल्या स्त्रोतांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती पावले उचलावीत अन्यथा कारवाईचा इशाराही पोहरे यांनी दिला.

कोरोनामुळे नमुन्यांवर परिणाम

विविध प्रकारची कारणे सांगून पाणी नमुने कमी असल्याच्या प्रकारावर पांघरुण घातले जात आहे. आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरणात गुंतली आहे. कोरोनामुळे इतरही कामे मागे लागल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे भूजल सर्वेक्षणच्या नमुन्यांचे प्रमाण मात्र चांगले आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत औंढ्यात ५२ पैकी १०, वसमतला ४९८ पैकी ५९, हिंगोलीत १७ पैकी ०, कळमनुरीत १०० पैकी १२ तर सेनगावात ८७ पैकी १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. हे प्रमाण १३ टक्के आहे.

या महिन्यात पुन्हा वाढीव काम करण्यासाठी सूचना देण्यात येणार असल्याचे जि.प.च्या सूत्रांनी सांगितले.

शहरी भागात कमी प्रमाण

शहरी भागात सहसा नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. बाहेरचे जलस्त्रोत कमी असतात. त्यामुळे शहरात दूषित नमुने आढळण्याचे प्रमाण कमी आहे.

शहरी भागात स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे हातपंपासारखे वापराचे स्त्रोत सहसा दूषित आढळत नाहीत.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे

पावसाळ्यात शहरी असो वा ग्रामीण भागातील उघडे जलस्त्रोत दूषित होण्याचा धोका जास्त असतो.

यामुळे जलजन्य आजारांचा धोकाही वाढतो. ब्लिचिंग पावडरचा वापर केला तर हा धोका टळतो.

अनेक ठिकाणी ब्लिचिंग टाकले की नाही, हेही कळत नाही. त्यामुळे पाणी उकळून व गाळून प्यायल्यास आजारी पडण्यापासून वाचता येते.

पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा.