शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३९ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले असून दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत आहे. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात १३.५० ...

हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले असून दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत आहे. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात १३.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मान्सून कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी ३९.८२ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र पुन्हा या दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी रात्री चांगलाच पाऊस बरसला. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात १३.५० मिमी पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात १३.६०, कळमनुरी १९.७०, वसमत १२.२०, औंढा नागनाथ १३.३०, सेनगाव तालुक्यात सर्वात कमी ९.१० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमीन अजूनही तहानलेली आहे.

सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यात

जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत ३१६.७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यात २९६.७० मिलिमीटर तर सेनगाव तालुक्यात २९७.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सर्वात जास्त पाऊस औंढा तालुक्यात २५३.५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर कळमनुरी ३४१.१० मिलिमीटर, तर हिंगोली तालुक्यात ३१२.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)

तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी

हिंगोली ८६७.९० ३१२.१० ३५.९६

कळमनुरी ७९५.४० ३४१.१० ४२.८८

वसमत ८२४.०० २९६.७० ३६.०१

औंढा ७३६.१० ३५३.५० ४८.०२

सेनगाव ७२९.७० २९७.५० ४०.७७

एकूण ७९५.३० ३१६.७० ३९.८२