शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

भाज्यांची आवक जास्तचं; पण ग्राहकच फिरकेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत पंधरा दिवसांची ...

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्राहक दुकानांवर येईनासे झाले आहेत, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. मंडईत कैरी ३० ते ४०, वांगे १५, चवळी १५, शेवगा २०, गवार १०, टोमॅटो १०, मिरची २०, आलू २०, आद्रक १५, काकडी १०, कोथिंबीर १०, कोबी १० रुपये किलोने विक्री होत आहे.

कोरोना आजारामुळे मंडई बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. छोटे विक्रेते ठोक विक्रेत्यांकडून भाज्यांची खरेदी करीत आहेत. परंतु गल्लीबोळातही भाज्यांची विक्री होत नाही. न विकलेल्या भाज्यांवर पाणी शिंपडून त्या घरातच ठेवण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. भाज्यांचे भाव गडगडल्याने भाजी उत्पादकांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.

किराणा बाजारातील चढ -उतार

किराणा बाजारात सोयाबीन तेल १४५, सूर्यफूल तेल १६५ याप्रमाणे विक्री झाले, तर गूळ ४०, साखर ३५, शेंगदाणा ११०, मूगडाळ ९०, मसूरडाळ ८०, हरभरा डाळ ७०, उडीद ९०, शाबुदाणा ६० रुपये प्रमाणे विक्री झाल्याची माहिती किराणा दुकानदार अमृत जयस्वाल यांनी दिली.

डाळींब, मोसंबीची आवक कमी

दोन आठवड्यांपासून डाळींब व मोसंबीची आवक कमीच आहे. शहरातील फळबाजारात डाळींब २००, मोसंबी २००, अंगूर ८०, सफरचंद १८०, नारळाचा दर ६० रुपयास नग असा भाव होता. आवक सुरु झाल्यास फळांचा भाव उतरू शकतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.