शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सौरपंपासाठी महावितरणकडे संपर्कासाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : जिल्ह्यात ४६६० सौरपंप बसविण्यात आले असून याबाबत काही तक्रारी असल्यास महावितरणच्या हिंगोली येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयातील सहायक ...

हिंगोली : जिल्ह्यात ४६६० सौरपंप बसविण्यात आले असून याबाबत काही तक्रारी असल्यास महावितरणच्या हिंगोली येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयातील सहायक अभियंत्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले.

जाधव यांनी सांगितले की, शासनाकडून या वेबसाईटवर नियंत्रण ठेवले जाते. यावर जवळपास १५ हजार ९९० जणांनी सौरपंपासाठी अर्ज केला होता. मात्र यातील ९६२६ अर्ज विविध कारणांनी रद्द झाले. तर ४९७१ जणांना कोटेशन दिले होते. यापैकी ४६६० जणांच्या शेतात पंप बसला आहे. तर ३०४ जणांचे काम होणे बाकी आहे. या पंपांबाबत महावितरणकडे महिन्यात दहा ते पंधरा तक्रारी येतात. मात्र जर अडचणी असतील तर सहायक अभियंता रेड्डी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यात पंपासह यंत्रणेची पाच वर्षांची हमी असून तोपर्यंत कंपनी जबाबदार असते, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यातील अटीत ही तक्रार बसली पाहिजे. शिवाय एचव्हीडीएसमध्ये ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या ४८८१ जणांना वीज जोडणी देणे बाकी होते. यापैकी ४१२७ जणांना जोडणी दिली. आता ७५४ जोडण्या शिल्लक आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत या जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय त्यानंतरचे आता २४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध नाही. वसुलीचे प्रमाण कमी असल्याने या नवीन कामांना मंजुरीत अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतर सेवा देण्यासाठीही त्या रोहित्रावर किमान ८० टक्के वसुलीचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे वसुली न भरल्यास अडचणी येत आहेत, असेही जाधव यांनी सांगितले.