शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका आकड्यावर आलेली संख्या दोन आकड्यांवर पोहोचत आहे. २० फेब्रुवारी ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका आकड्यावर आलेली संख्या दोन आकड्यांवर पोहोचत आहे. २० फेब्रुवारी रोजी तब्बल १९ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल २७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात २६ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये एकही रुग्ण आढळला नसला तरी आरटीपीसीआर टेस्टमध्ये तब्बल २७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात २०, सेनगाव ३ तर कळमनुरी परिसरात ४ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी शनिवारी तब्बल ११ रुग्ण बरे झाले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ९ तर औंढा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाचे ३ हजार ८९१ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ९३ रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

प्रशासनाची उदासीनता की नागरिकांची निष्काळजी

जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. रुग्णसंख्या घटल्याने आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते. त्यामुळे कोरोना जिल्ह्यातून हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक राहत आहेत. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कायम राहत असून, तोंडाला मास्क न वापरणे, शारीरिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनही ठोस कारवाई करीत नसल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळत आहे.