शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'वाटपा'नंतर आता वसुलीला वेग

By admin | Updated: October 23, 2014 14:28 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'वाटप' झाले. काही जणांना तर पोलिसांनी पकडलेही.

हिंगोली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'वाटप' झाले. काही जणांना तर पोलिसांनी पकडलेही. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरू होता. आता पराभव झाल्याने काहींनी वसुली सुरू केली आहे. त्यात काहींची फसगत झाली आहे.

जिंकण्याच्या इर्षेने साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर केला जातो. यातील दामावर तर सर्वाधिक भर असतो. हे दाम घेतल्यानंतरही अनेकांनी काम केले नाही. काहींनी काम केले असले तरी मतदारांनी 'काम' दाखविले. परिणामी, 'त्या' गावातील बुथवर झालेली कमाल उमेदवारांना मतमोजणीनंतर प्रत्यक्ष दिसूनच आली. तेथे पडलेली मते अन् झालेल्या वाटपाचा ताळमेळ बसणे तर सोडाच मात्र त्याच्या पाषाणालाही पुरणारी मते नाहीत. हा खर्च व्यर्थ गेला की संबंधिताच्या 'खिशात' यासाठी तपासणी होत आहे. जोर लावून 'खिसा' खाली करवून घेण्याचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारात ज्यांनी खरेच काम न करता खिसा गरम केला होता, ते निमूटपणे वाटपाची रक्कम परत करीत आहेत. मात्र ज्यांनी वाटप करूनही काम झाले नाही, त्यांचे अवघड झाले आहे. मतदारांपर्यंत हे लोण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे-जे वाटपाचे लाभार्थी झाले, ते आता दिवाळीतच अडचणीत येण्याची शक्यता आहे. काहींच्या घरात 'वाटपा'मुळे दिवाळीचा प्रकाश पडला असला तरी दारात वसुलीदार उभा राहिल्यानंतरच डोक्यात 'प्रकाश ' पडणार आहे. आगामी काळात याचे अनेक किस्से ऐकायला मिळतील. कदाचित यावरून काही जणांचा झालेला संताप तंटेही उद्भवणारा ठरू शकतो.